शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

६९ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

By admin | Updated: September 25, 2014 00:53 IST

उमरगा : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, तूर, उडीद, संकरीत ज्वारी या खरीप पिकांची वाढ खुंटली असून,

उमरगा : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, तूर, उडीद, संकरीत ज्वारी या खरीप पिकांची वाढ खुंटली असून, वाढीस लागलेली पिके पिवळी पडू लागल्याने अपुऱ्या ओलीमुळे ६९ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत.तालुक्यात यावर्षी पावसाने तब्बल एक महिन्याने उशिरा प्रारंभ केला. ७ जुलैपासून होणाऱ्या खरीप पेरण्या एक महिन्याने उशिराने सुरु झाल्या. खरीप हंगाम पेऱ्याचा हंगाम निघून गेल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला अधिकची पसंती दर्शविली. तालुक्यात पावसाची एकूण ८५० सरासरी असताना आतापर्यंत फक्त ४५० मिमी पाऊस झाला आहे. मध्यंतरीच्या कालावधी दरम्यान, पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. गणेशोत्सव कालावधीदरम्यान, पावसाचे पुन्हा पुनरागमन झाल्याने पिकांना जीवदान मिळत पिके सावरली असली तरी मागील २० दिवसांपासून उष्णतेची तीव्रता आणि पावसाची कमतरता यामुळे जमिनीतील ओल कमी होवून वाढीस लागलेली पिके पिवळी पडू लागली आहेत. तुरीच्या एकूण सरासरी १४ हजार ६८० हेक्टर क्षेत्रांपैकी १३ हजार ३५३ हेक्टर क्षेत्रात पेरण्या करण्यात आल्या आहेत. मुगाच्या एकूण चार हजार ५०० हेक्टर क्षेत्रांपैकी फक्त एक हजार ६० हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली आहे. उडीदाच्या एकूण ८ हजार ९६५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. खरीप ज्वारीच्या एकूण ११ हजार २५१ हेक्टर क्षेत्रांपैकी ७ हजार २७२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी उशिराने पेरण्या झाल्याने सोयाबीन पेऱ्याला अधिकची पसंती दर्शविली असून, तालुक्यात सोयाबीनचे सरासरी ६ हजार ९१७ हेक्टर क्षेत्र असताना तालुक्यातील शेतकऱ्यांनी २५ हजार १७७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनच्या पेरण्या केल्या आहेत. (वार्ताहर)