शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

खरीप पेरणी वाया जाण्याची भीती!

By admin | Updated: July 2, 2017 00:38 IST

जाफराबाद : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने खरिपाची पेरणी वाया जाण्याच्या चिंतेने शेतकरी हैराण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील ६० हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने खरिपाची पेरणी वाया जाण्याच्या चिंतेने शेतकरी हैराण आहे.तालुक्याचे जीवनमान शेती व्यवसायावर अवलंबून आहे. मागील वर्षात खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने पेरण्या तोंडावर आल्या असताना जवळ आहे त्या पैशांत बी-बियाणांवर खर्च करण्यात आला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पडून जमिनीतून वाहून गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काही भागात दुबार पेरणी करून यावर पाणीच पडला नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. पावसाळ्या पूर्वी भाव न मिळाल्याने कोणती पिक घ्यावयाचे या विषयी शेतकरी संभ्रमावस्थेत होता. त्यातून सावरत लागवड केली आहे. आता फक्त निळ्या आभाळाकडे नजर लागून आहे.मागील वर्षी तालुक्यातील ६१ हजार ९७६ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या होत्या. या वर्षात पावसाळा समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असल्याने जवळपास ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक प्रमाणात पेरण्या झाल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊन तालुक्याच्या बोरगाव बु., हिवराबळी या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी शेतीवर मोठा खर्च केला आहे. तरी देखील पिके येण्याची हमी नाही. तालुक्यात शेती व्यवसायाला पूरक उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे तालुक्याचे जीवनमान शेतीवर अवलंबून आहे. मागील दोन वर्षांची दुष्काळी परिस्थिती ओढवल्याने शेतकरी अडचणीत आहे. कृृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.