शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

संमेलन यशस्वी करण्याची संतांच्या भूमीत धमक

By admin | Updated: April 16, 2017 23:20 IST

उस्मानाबाद :९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनानिमित्त आयोजित नाट्य महोत्सवाचे रविवारी सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन करण्यात आले़

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याला कोणताही मोठा कार्यक्रम द्यायचा म्हटलं की, तो यशस्वी होतो की नाही, असा प्रश्न मुंबई, पुण्याचे लोक उपस्थित करतात़ मात्र, श्री तुळजाभवानी, श्री संत गोरोबाकाकांच्या भूमीत होणारे नाट्य संमेलन यशस्वी करण्याची धमक येथील भूमिपूत्रांमध्ये आहे़ ‘माझं गाव, माझं संमेलन’ याप्रमाणे नाट्य महोत्सव आणि नाट्य संमेलन हे नक्कीच यशस्वी होणार असल्याचा विश्वास आ़ मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केला़९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनानिमित्त आयोजित नाट्य महोत्सवाचे रविवारी सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन करण्यात आले़ यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आ़ चव्हाण बोलत होते़ कार्यक्रमास खा़ रवींद्र गायकवाड, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा आमदार सुजितसिंह ठाकूर, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत नाडापुडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, प्रमुख कार्यवाहक दीपक करंजीकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, कळंबच्या नगरध्यक्षा सुवर्णा मुंडे, उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, निमंत्रक धनंजय शिंगाडे, रहेमान काझी, शाखाध्यक्ष विशाल शिंगाडे आदी उपस्थित होते़ प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले़ शाखाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी प्रास्ताविक केले़ यावेळी बोलताना स्वागताध्यक्ष आ़ ठाकूर म्हणाले, सर्वांच्या प्रयत्नातून उस्मानाबादेत होणारे ९७ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ऐतिहासिक करण्याचा संकल्प केला आहे़ आजवरची संमेलने तीन दिवसांची होत होती़ मात्र, नाट्य संमेलनापूर्वी नाट्य महोत्सवाचे आयोजन करून हे संमेलन आठ दिवसांचे केले आहे़ आजवरच्या नाट्य संमेलनाचे ‘संमेलन गित’ तयार करण्यात आले नव्हते़ यंदा प्रथमच उस्मानाबादच्या संमेलनाचे ‘संमेलन गित’ तयार करण्यात आले असून, ही परंपरा पुढे कायम राहणार आहे़ जिल्ह्यात अनेक कलाकार आहेत, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महोत्सवरूपी एक व्यासपीठ उभा राहिले आहे़ यादरम्यान, गाजलेली सात नाटके, तीन लोककला, विविध एकांकिका आदी कार्यक्रमांची मेजवानी उस्मानाबाद जिल्ह्यातील रसिकांना मिळणार आहे़ संमेलन यशस्वी करून राज्यासमोर एक आदर्श ठेवण्याचे प्रयत्न आमच्या सर्व समित्यांचे सदस्य करीत असल्याचेही आ़ ठाकूर यावेळी म्हणाले़खा़ रवींद्र गायकवाड यांनी आपल्या शैलीत भाषणाला सुरूवात केली़ उस्मानाबादला कार्यक्रम द्यायचे म्हटलं तर ‘विमान’ नाही असा विचार केला जातो, असे ते म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला़ क्षेत्र कोणतेही असो उस्मानाबादला कार्यक्रम द्यायाचा म्हटलं की तारखा मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे़ मात्र, मोठ्या प्रयत्नातून उस्मानाबादला ९७ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आयोजनाची संधी मिळाली आहे़ संमेलनात आज असणाऱ्या उणिवा उद्या दुरूस्त करून ते यशस्वी करण्यात येईल, असेही ते म्हणाले़ पुढे बोलताना आ़ चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात झालेले आजवरचे सर्वच कार्यक्रम यशस्वी झाले आहेत़ ९७ वे नाट्य संमेलनही राजकारण विरहित सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने यशस्वी होईल़ यापुढील काळात जिल्ह्यात कुस्तीगिर परिषद घेणे गरजेचे असून, विविध क्षेत्रातील गुणवंतांसाठी निधी उभा करून त्यांना मदत करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही आ़ चव्हाण यांनी केले़ कार्यकमास शहरासह परिसरातील नाट्यप्रेमी नागरिक उपस्थित हाते़ (प्रतिनिधी)