शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

वीजतोडणीमुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:17 IST

तालुक्यातील शेतकºयांकडे २ कोटी ७० लाख रूपये वीजबिल थकित असून ते न भरल्यामुळे ५ हजार ५०० वीजजोडण्या तोडल्या आहेत. परिणामी उभे पीक जाळून नष्ट करण्याचा गोरखधंदा मांडल्याने दुष्काळात तेराव्या महिन्याचा प्रत्यय बळीराजास येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील शेतकºयांकडे २ कोटी ७० लाख रूपये वीजबिल थकित असून ते न भरल्यामुळे ५ हजार ५०० वीजजोडण्या तोडल्या आहेत. परिणामी उभे पीक जाळून नष्ट करण्याचा गोरखधंदा मांडल्याने दुष्काळात तेराव्या महिन्याचा प्रत्यय बळीराजास येत आहे़आदिवासी, डोंगराळ, नक्षल, बंजारा, आदिवासीप्रवण बहुतांश क्षेत्र पेसा अंतर्गत असलेल्या तालुक्यातील शेतकºयांकडे असलेले २ कोटी ८० लाख थकबाकी आहे़ त्यामुळे साडेपाच हजार जोडण्या तोडण्यात आल्या आहेत़ यासंदर्भात माहूरचे सहायक अभियंता जे़ एस़ मेश्राम यांनी, १०० टक्के आदेशाचा मी ताबेदार असल्याने या वीजजोडण्या तोडल्या आहेत़ मी सुद्धा शेतकºयांचा मुलगा असल्याने व्यथित झालो असल्याचे म्हटले आहे़ माहूर परिसरातील बहुतांश अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त व बहुजन शेतकºयांच्या मनात तीव्र असंतोष आहे़दिवाळीनंतर शेतमालाचे भाव पडल्याने सरकारने शेतकºयांना कर्जमाफी न देता थकित वीज देयकापैकी चालू देयके भरण्याची सक्ती केली आहे़ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याहीवर्षी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ घोषित करून त्यानुसार शेतकºयांना चालू देयके भरून त्यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवावयाचा व थकित रक्कमेवर हप्ते पाडून त्यावरील व्याज व दंड माफ करण्याची घोषणा केली आहे.अवकाळी पावसामुळे कापूस केवळ २ हजार रुपये प्रतिक्विंटल तर काळे पडलेले सोयाबीन हजार रुपये प्रतिक्विंटलने विकले जात आहे़तालुक्यातील शेतकरी शोषित व गोरगरीब असल्यामुळे तसेच या परिसरातील जमिनी भरकाड व चिभाड असल्याने ते दशकानुदशके अर्धपोटी जीवन जगत आहेत़ या परिस्थितीत पोटाला भाकरच नाही, विद्युत बिल कसे भरणार? हा प्रश्न आहे़ सध्या हरभरा जमिनीतच असून शेतकºयांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे़ हा प्रकार निंदनीय असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते जयकुमार अडकिणे व शेतकरी नेते अविनाश टनमने यांनी व्यक्त केले आहे.