शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
4
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
5
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
6
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
7
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
9
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
10
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
11
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
12
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
13
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...
14
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
15
दहावीतील गुणांवरून नातेवाईकांनी उडवली होती खिल्ली, आता तरुणाने बँकेचा SMS दाखवला; आकडा पाहून 'बोलती बंद'
16
कोल्हापूरकरांच्या विरोधाची धग अंबानीपर्यंत पोहोचली; वनताराचे पथक नांदणीत येणार
17
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
18
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
19
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
20
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच

हजारावर शेतकर्‍यांनी मोडला बैल-बारदाना

By admin | Updated: May 15, 2014 00:01 IST

रमेश शिंदे, औसा मागील पाच-सहा वर्षांपासून पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, अवेळी पडणारा पाऊस, परिणामी शेतकर्‍यांचे होणारे मोठे नुकसान यामुळे शेती व्यवसायच पूर्णपणे कोलमडून पडला आहे़

 रमेश शिंदे, औसा मागील पाच-सहा वर्षांपासून पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, अवेळी पडणारा पाऊस, परिणामी शेतकर्‍यांचे होणारे मोठे नुकसान यामुळे शेती व्यवसायच पूर्णपणे कोलमडून पडला आहे़ निसर्गाच्या लहरी फटक्याने नको ती शेती असे म्हणण्याची अवस्था आता शेतकर्‍यांची झाली आहे़ एकीकडे चार्‍याची टंचाई तर दुसरीकडे सालगडी व रोजंदाराची गंभीर बनत चाललेली समस्या यामुळे औसा तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांवर बैल -बारदाना मोडण्याची वेळ आली आहे़ औसा तालुक्यात १ लाख २० हजार ७२० हेक्टर शेतीचे क्षेत्र आहे़ बहुतांश शेती ही पाण्यावर अवलंबून आहे़ सिंचनाचे क्षेत्रही अत्यल्प असल्यामुळे पावसाळीवरच शेती अवलंबून आहे़ आठ-दहा एकर शेती असणारा शेतकरी दोन बैल, एखाद दुसरे दुधाचे जनावर सांभाळतो़ परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून शेतीमध्ये उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ या अवस्थेमुळे शेती व्यवसायच पूर्णपणे कोलमडला असून, शेतकरी राजा कंगाल झाला आहे़ शेतीमध्ये सालगडी मिळेनात, हंगामात मजूर मिळेनात़ यामुळे अल्पभूधारक शेतकरी आता आपली शेती वाट्याने किंवा पैशाने दुसर्‍याकडे वर्षभरासाठी लावून देत आहे़ औसा तालुक्यात सव्वा ते दीड लाखाच्या जवळपास पशुधन आहे़ यामध्ये ५६ हजार बैलजोड्या आहेत़ शेतकर्‍यांकडे दोन ते चार बैल तर लहान शेतकर्‍यांकडे दोन बैल, असे साधारण चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे़ म्हणून आता लहान शेतकरी नको ती झंझट म्हणून आपला बारदाना मोडीत काढीत आहे़ यावर्षी तर अवकाळी पावसाने कहरच केला आहे़ रबी हंगामातील बहुतांश पिके ही गारपिटीमुळे हातची गेली़ कडबा काळा पडला़ त्यामुळे आता जनावरांना सांभाळायचे कसे, असा प्रश्न शेतकर्‍यांना सतावतो आहे़ चांगली बैलजोडी, औजारे करायचे म्हटले की, किमान लाख-दीड लाख रुपये खर्च येतो़ एवढा खर्च करून केलेला हा बारदाना शेतकरी जड अंतकरणाने मोडीत काढत आहेत़ आमच्यापेक्षा रोजंदार बरे़़़ यासंदर्भात बोलताना शेतकरी लिंबराज जाधव म्हणाले, पाच वर्षांपासून शेती नुकसानीत आहे़ हे वर्ष गेले, आता पुढील वर्ष तरी चांगले राहील म्हणून पाच वर्षे काढली़ पण; खर्च अधिक आणि उत्पन्न कमी, अशी परिस्थिती झाली़ आमच्याकडे माल असला की भाव कमी आणि आम्ही घ्यायला गेलो की, भाव जास्त असे होत आहे़ आमच्यापेक्षा रोजंदारी करणारे बरे़ दिवसभर काम केले की, २०० रूपये मिळतात़ परिणामी, १ लाख ४० हजार रूपयांचा बैल-बारदाना एक लाखात विकला आणि शेती बटईने दिल्याचे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले़ लहरी शेतीमुळे शेती व्यवसायाकडे पाठ केली जात आहे.