शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
4
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
7
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
8
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
9
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
10
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
11
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
12
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
14
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
15
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
16
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
17
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
18
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
19
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द

जात पंचायतीने कुटुंबाला टाकले वाळीत

By admin | Updated: October 7, 2016 01:31 IST

औरंगाबाद : जातीपातीच्या बेड्या आजही प्रचंड मजबूत आहेत. मागास आणि आदिवासी समाजातील कौटुंबिक वादावरही जात पंचायतीकडूनच निर्णय केला जातो

औरंगाबाद : जातीपातीच्या बेड्या आजही प्रचंड मजबूत आहेत. मागास आणि आदिवासी समाजातील कौटुंबिक वादावरही जात पंचायतीकडूनच निर्णय केला जातो. अशाच एका घटनेत जडीबुटी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चित्तोडिया लोहार समाजातील एका कुटुंबाला तब्बल तीन वर्षांपासून जातीबाहेर टाकण्यात आले आहे. कुटुंबातील एका सदस्यावर त्याच्याच सासऱ्याने परस्त्रीसोबत संबंध असल्याचा आरोप ठेवल्याने या कुटुंबाला तीन वर्षांपासून त्यांच्याच समाजात स्थान नाही. परिणामी या कुटुंबात कोणीही मुलगी देण्यास तयार नसल्याने दोन तरुणांचे विवाह होऊ शकले नाही.याविषयी अधिक माहिती अशी की, देवळाई परिसरातील विनायक पार्कजवळ राणसिंग तेजसिंग चित्तोडिया (३५) हे पत्नी ताराबाई, भाऊ तारासिंग, रामसिंग आणि आई-वडील यांच्यासह राहतात. हे कुटुंब जडीबुडी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. आॅगस्ट-२०१३ मध्ये राणासिंग यांना त्यांचे सासरे रतनसिंग ठाकूर (रा. हिंजेवाडी, दत्तवाडी, पुणे) यांनी फोन करून तू एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवले आहे. त्यामुळे तुम्हा सर्व कुटुंबांना जातीबाहेर काढून टाकले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही दिली. राणासिंग यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळत ‘त्या महिलेचे नाव सांगा’ असे आव्हान देऊन ते खरे निघाल्यास कोणतीही शिक्षा भोगायला तयार असल्याचे सांगितले. काही दिवसांनंतर रतनसिंग ठाकूर हे रवींद्रसिंग ठाकूर, देवीसिंग चित्तोडिया, कृष्णासिंग चित्तोडिया आणि नवलसिंग चित्तोडिया हे औरंगाबादेत आले. यावेळी त्यांनी पुन्हा राणासिंग यांच्यावर परस्त्रीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप केला. त्यांनी तुमच्या कुटुंबाला जातीबाहेर काढण्यात आल्याचे पुन्हा सांगितले. पुन्हा जातीत यायचे असेल तर गंगापरीक्षा (शुद्धीकरण) द्यावी लागेल, असे सांगितले.पाच जणांविरोधात गुन्हाराणासिंग यांनी २९ सप्टेंबर रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी आरोपी रतनसिंग ठाकूर, रवींद्रसिंग ठाकूर, देवीसिंग चित्तोडिया, कृष्णासिंग चित्तोडिया व नवलसिंग चित्तोडिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.