शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

एक हजार कुटुंब पूररेषेत

By admin | Updated: August 2, 2014 01:09 IST

नांदेड : महापालिका हद्दीत ३५४ मीटर पातळीच्या पूररेषेत शहरातील १ हजार कुटुंब असून दरवर्षी महापालिका या कुटुंबांना नोटीस देवून आपले कर्तव्य पार पाडते़

नांदेड : महापालिका हद्दीत ३५४ मीटर पातळीच्या पूररेषेत शहरातील १ हजार कुटुंब असून दरवर्षी महापालिका या कुटुंबांना नोटीस देवून आपले कर्तव्य पार पाडते़ मात्र या कुटुंबांच्या कायमस्वरूपी सुरक्षेसाठी अद्याप नियोजन करण्यात आले नाही़ नांदेड शहरातील गोदावरी नदीकाठी असलेल्या १ हजार कुटुंब पूररेषेत येतात़ या कुटुंबांना प्रत्येक पावसाळ्यात महापालिका नोटिसा देण्याचे सोपस्कार पार पाडते़ मात्र या भागातील नागरिकांच्या कायमस्वरूपी सुरक्षेसाठी कोणताही आराखडा तयार करण्यात आला नाही़ २००४ मध्ये नांदेड शहराला महापुराचा तडाखा बसला होता़ यावेळी नालागुट्टाचाळ, खडकपुरा, गोवर्धनघाट, वजिराबाद, नगीनाघाट, रामघाट, शनिमंदिर, गाडीपुरा, नावघाट, वसरणी हा भाग पाण्याखाली आला होता़ त्यावेळी येथील नागरिकांचे जीव वाचविण्यात आले होते़ त्यानंतर प्रत्येक पावसाळ्यात पूररेषेतील कुटुंबांच्या स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर येत असे़ मात्र नोटीस देण्यापलीकडे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही़ पूररेषेत सध्या मोठ्या इमारती बांधण्यात आल्या असून या इमारतींच्या बांधकामांना महापालिकेने परवानगी दिली आहे़ त्यामुळे गोरगरिबांचे घरेही या भागात झपाट्याने वाढले़ सध्या बीएसयुपी योजनेतंंर्गत गोवर्धनघाट येथे लाभार्थ्यांसाठी बहुमजली इमारत उभारण्यात आली आहे़ ही इमारतही पूररेषेत येते़ शहरातील लोकवस्ती असलेला बराचसा भाग गोदावरी नदीकाठावर वसला आहे़ अतिवृष्टीनंतर शहरातील काही सखल भागात अधिक पाणी साचून कुटुंबाची जिवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ पूर पातळीत ज्या कुटुंबाचे वास्तव्य आहे़ त्यांना पूर परिस्थितीच्या कालावधीत नुकसानीचा धोका संभवतो़ अशा संबंधित मालमत्ता धारकांनी मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम २६३ चे उल्लंघन करून नियमितच्या पूरग्रस्त भागात अनधिकृतपणे बांधकाम केले असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे़ त्यानूसार संबंधित कुटुंबांना सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाहून इतर सुरक्षित जागेवर स्थलांतरण करण्याच्या नोटिसा मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत बजावण्यात आल्या आहेत़ वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयातंर्गत ४४५ कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत़ पूररेषेतील कुटुंबांना नोटीस देवून घरे रिकामे करण्याविषयी कळविले आहे़ संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी १२ केंद्र स्थापन करण्यात आले आहेत़ तसेच २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करून त्याठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे़ झोन क्रं ३ इतवारा भागातील साडेतीनशे कुटुंबांना नोटिसा बजावल्याचे आहेत़ ( प्रतिनिधी)