शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे ड्रोनने हल्ले; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
3
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
4
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
5
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
7
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
9
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
10
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
11
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
13
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
14
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
15
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
16
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
17
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
18
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
19
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
20
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

एक हजार कुटुंब पूररेषेत

By admin | Updated: August 2, 2014 01:09 IST

नांदेड : महापालिका हद्दीत ३५४ मीटर पातळीच्या पूररेषेत शहरातील १ हजार कुटुंब असून दरवर्षी महापालिका या कुटुंबांना नोटीस देवून आपले कर्तव्य पार पाडते़

नांदेड : महापालिका हद्दीत ३५४ मीटर पातळीच्या पूररेषेत शहरातील १ हजार कुटुंब असून दरवर्षी महापालिका या कुटुंबांना नोटीस देवून आपले कर्तव्य पार पाडते़ मात्र या कुटुंबांच्या कायमस्वरूपी सुरक्षेसाठी अद्याप नियोजन करण्यात आले नाही़ नांदेड शहरातील गोदावरी नदीकाठी असलेल्या १ हजार कुटुंब पूररेषेत येतात़ या कुटुंबांना प्रत्येक पावसाळ्यात महापालिका नोटिसा देण्याचे सोपस्कार पार पाडते़ मात्र या भागातील नागरिकांच्या कायमस्वरूपी सुरक्षेसाठी कोणताही आराखडा तयार करण्यात आला नाही़ २००४ मध्ये नांदेड शहराला महापुराचा तडाखा बसला होता़ यावेळी नालागुट्टाचाळ, खडकपुरा, गोवर्धनघाट, वजिराबाद, नगीनाघाट, रामघाट, शनिमंदिर, गाडीपुरा, नावघाट, वसरणी हा भाग पाण्याखाली आला होता़ त्यावेळी येथील नागरिकांचे जीव वाचविण्यात आले होते़ त्यानंतर प्रत्येक पावसाळ्यात पूररेषेतील कुटुंबांच्या स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर येत असे़ मात्र नोटीस देण्यापलीकडे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही़ पूररेषेत सध्या मोठ्या इमारती बांधण्यात आल्या असून या इमारतींच्या बांधकामांना महापालिकेने परवानगी दिली आहे़ त्यामुळे गोरगरिबांचे घरेही या भागात झपाट्याने वाढले़ सध्या बीएसयुपी योजनेतंंर्गत गोवर्धनघाट येथे लाभार्थ्यांसाठी बहुमजली इमारत उभारण्यात आली आहे़ ही इमारतही पूररेषेत येते़ शहरातील लोकवस्ती असलेला बराचसा भाग गोदावरी नदीकाठावर वसला आहे़ अतिवृष्टीनंतर शहरातील काही सखल भागात अधिक पाणी साचून कुटुंबाची जिवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ पूर पातळीत ज्या कुटुंबाचे वास्तव्य आहे़ त्यांना पूर परिस्थितीच्या कालावधीत नुकसानीचा धोका संभवतो़ अशा संबंधित मालमत्ता धारकांनी मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम २६३ चे उल्लंघन करून नियमितच्या पूरग्रस्त भागात अनधिकृतपणे बांधकाम केले असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे़ त्यानूसार संबंधित कुटुंबांना सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाहून इतर सुरक्षित जागेवर स्थलांतरण करण्याच्या नोटिसा मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत बजावण्यात आल्या आहेत़ वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयातंर्गत ४४५ कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत़ पूररेषेतील कुटुंबांना नोटीस देवून घरे रिकामे करण्याविषयी कळविले आहे़ संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी १२ केंद्र स्थापन करण्यात आले आहेत़ तसेच २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करून त्याठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे़ झोन क्रं ३ इतवारा भागातील साडेतीनशे कुटुंबांना नोटिसा बजावल्याचे आहेत़ ( प्रतिनिधी)