शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांनी पाडले रस्त्याचे तुकडे, तेच करणार चौकशी

By admin | Updated: December 26, 2014 00:16 IST

शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद रस्त्याचे तुकडे करून टप्प्याटप्पाने कामे करण्याचा जिल्हा परिषदेचा गोरखधंदा तपासण्यासाठी शिक्षण-आरोग्य सभापती विनोद तांबे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

शांतीलाल गायकवाड, औरंगाबादरस्त्याचे तुकडे करून टप्प्याटप्पाने कामे करण्याचा जिल्हा परिषदेचा गोरखधंदा तपासण्यासाठी शिक्षण-आरोग्य सभापती विनोद तांबे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक मंगळवारी झाली असून, दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्यांनी रस्त्याचे तुकडे पाडून कंत्राटांची खिरापत वाटली, तेच आता ही चौकशी करणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी सांगितले की, रस्ते तुकडे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. सभापती विनोद तांबे समितीचे अध्यक्ष असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.बी. लांगोरे, लेखा विभागाचे कोटगिरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर हे सदस्य असून उपअभियंता हम्पीहोळी हे समितीचे सचिव आहेत. या समितीची पहिली बैठक मंगळवारी झाली. त्यात समितीने दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आल्याचे विनोद तांबे यांनी सांगितले. ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणांतर्गत या वर्षी १५ कोटी रुपये निधीतून १६३ कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता शासन निकषानुसार आहेत का? याचा शोध या समितीने घ्यावयाचा आहे. हे आहेत निकष २०११ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेने १५ लाखांच्या मर्यादेतील विकासकामे वाटप करताना ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत कामे होतील त्या ग्रामपंचायतीला कामे देण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीने काम करण्यास असमर्थता दर्शविल्यानंतरच बांधकाम विभागाने कामाचे निहित टक्केवारीनुसार ड्रॉ पद्धतीने आरक्षण पाडून पाच लाखांच्या आतील कामे मजूर सोसायट्या व नोंदणीकृत बेरोजगार अभियंत्यांना द्यावीत. पाच लाखांवरील कामाच्या ई-निविदा मागवाव्या लागतात. राज्य नियोजन विभागाने ११ मार्च २०१० रोजी जारी केलेल्या परिपत्रकात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नवीन रस्त्यांच्या कामांना मंजुरी कशी द्यावी, याचे निकष दिले आहेत. त्यातील अंतिम व महत्त्वाचा निकष असे सांगतो की, रस्त्यांचे काम हाती घेताना पूर्ण रस्त्याचे काम हाती घ्यावे व सदर काम तुकडे पाडून करू नयेत. चूक त्यांनी अगोदरच मान्य केलीयकामे करताना सलग रस्ता घ्यावा लागतो. तुकडे पाडणे हे चूकच. त्यामुळे पैशाचा विनियोग होत नाही; परंतु कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी समितीची पर्यायाने पदाधिकाऱ्यांची असते. त्यांनी सुचविलेली कामे फक्त आम्ही घेतो. अशी कामे घेऊ नयेत, हे मत मी सभागृहात वारंवार नोंदविले आहे, अशी प्रतिक्रिया बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी प्रारंभीच नोंदवून, नियोजन झाले ते चुकीचेच असल्याची कबुली दिली होती. सरकारी निकषाचे धज्जे उडवून ज्यांनी रस्त्याचे तुकडे पाडले, तेच आता त्यांची चूक शोधणार आहेत, यावर जिल्हा परिषदेतच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.