शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पाण्याने रस्त्यांची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:14 IST

भूमिगत गटार योजनेअंतर्गत कांचनवाडी येथील ट्रीटमेंट प्लँटवर दररोज ५६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. शुद्ध केलेले पाणी फेकून देण्यापेक्षा ते तूर्त शहरातील रस्त्यांवर आणून टाकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भूमिगत गटार योजनेअंतर्गत कांचनवाडी येथील ट्रीटमेंट प्लँटवर दररोज ५६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. शुद्ध केलेले पाणी फेकून देण्यापेक्षा ते तूर्त शहरातील रस्त्यांवर आणून टाकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरवासीयांना धूळकणांचा होणारा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा मनपाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारपासूनच या उपक्रमाला सुरुवात करण्यात येत आहे.महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी हायस्कूलसमोरील रोड धूळमुक्त करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. या उपक्रमाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला नाही. ४०० कोटी रुपये खर्च करून महापालिकेने शहरात भूमिगत गटार योजना राबविली. या योजनेनुसार कांचनवाडी येथील ट्रीटमेंट प्लँटवर दूषित पाणी नेण्यात येत आहे. दररोज येथे ५६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. हे पाणी कोणीही घेण्यास तयार नाही. वापरण्यासाठी हे पाणी उत्तम आहे. दोन टँकरच्या मदतीने तूर्त या पाण्याचा उपयोग शहरातील मुख्य रस्ते स्वच्छ करण्यासाठी करावा, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कांचनवाडी येथील ट्रीटमेंट प्लँटवर आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या आदेशाने टँकर भरण्यासाठी स्टँड पोस्ट तयार करण्यात आले आहेत. गुरुवारपासून दोन टँकर वापरण्यायोग्य पाणी शहरातील मुख्य रस्त्यांवर आणून टाकण्यात येणार आहे. संबंधित टँकरवर मराठीत वापरण्याचे पाणी असे लिहिण्यात येणार आहे. बुधवारी रात्री शहरातील काही रस्त्यांवरही पाणी आणून टाकण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे.दरवर्षी महापालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येते. पाण्याअभावी असंख्य झाडे जळून जातात. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करण्यात येते. फक्त पाणी नसल्याने झाडे वाळून जात आहेत. कांचनवाडी येथील पाणी काही दुभाजकांमधील झाडांसाठीही करावा, असा विचार पदाधिकारी, नगरसेवकांनी व्यक्त केला. टँकरची संख्या वाढवून मिळाल्यास हा सुद्धा प्रयोग करून पाहण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.