शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

तेरा वर्षांपूर्वीचा वाद समन्वयातून मिटवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:06 IST

केळगाव : ग्रामीण भागात सर्वाधिक वाद शेतीच्या कारणावरून होत असल्याचे चित्र आहे. असाच काहीसा वाद केळगावातील इंगळे कुटुंबीयात वारंवार ...

केळगाव : ग्रामीण भागात सर्वाधिक वाद शेतीच्या कारणावरून होत असल्याचे चित्र आहे. असाच काहीसा वाद केळगावातील इंगळे कुटुंबीयात वारंवार होत असल्याने दोन्ही गटांकडून पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या; मात्र यात आमठाणा पोलिसांनी समन्वयातून हा वाद निकाली काढण्यात यश मिळवले. १३ वर्षांपूर्वीचा वाद संपुष्ठात आला.

सिल्लोड तालुक्यातील केळगावात सुनील पुंडलिक इंगळे, हर्षल पुंडलिक इंगळे तसेच दीपक पुंडलिक इंगळे, अनिल पुंडलीक इंगळे (सावत्र भाऊ-भाऊ) यांच्यात गेल्या १३ वर्षांपासून शेतीचा वाद सुरू होता. यामुळे दोन्ही गटात कायम भांडणे होत असल्याचे समोर येत हाेते. गेल्या २० दिवसांपूर्वी संबंधितांमध्ये पुन्हा वाद झाल्याने तो आमठाना पोलीस चौकीपर्यंत गेला. दोघांनी एकमेकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. यात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे, बीट जमादार रंगराव बावस्कर, पोलीस नाईक मगेश आरके, बाळासाहेब इवरे आदींच्या सहकार्याने तक्रारदारांची समजूत काढत त्यांच्यातील वाद मिटवला. विशेष म्हणजे गावातील नागरिक आणि पोलिसांच्या उपस्थितीत एकमेकांच्या सहमतीने संबंधितांनी शेतीची वाटणी करून घेतली. या सकारात्मक निर्णयामुळे तब्बल १३ वर्षांनंतर इंगळे कुटुंबीयांतील वादास पूर्णविराम मिळाला.

............प्रतिक्रिया ................ ग्रामीण भागात शेतीसह किरकोळ घटनेमुळे वाद विकोपाला जातात. वाद कमी करण्याच्या उद्देशाने ‘आम्ही पोलीस आपल्या बांधावर’ या संकल्पनेतून केळगावातील वाद संपुष्टात आणत दोन्ही गटांना समोरासमोर बोलावून मार्गदर्शन केले. त्यामुळे संबंधित वाद मिटल्याने त्यांचा पुढील होणारा त्रास कमी झाला.

- किरण बिडवे,

सहायक पोलीस निरीक्षक,

ग्रामीण पोलीस ठाणे सिल्लोड.