शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तेरा लाखांची धाडसी चोरी

By admin | Updated: June 18, 2014 01:26 IST

सोनपेठ: येथील बुरांडेनगरातील डॉ. मधुकरराव बुरांडे यांच्या घरी १७ जून रोजी पहाटे झालेल्या चोरीत चोरट्यांनी घराच्या चॅनलगेट व घरातील खोल्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून

सोनपेठ: येथील बुरांडेनगरातील डॉ. मधुकरराव बुरांडे यांच्या घरी १७ जून रोजी पहाटे झालेल्या चोरीत चोरट्यांनी घराच्या चॅनलगेट व घरातील खोल्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून ३५ तोळे सोने व रोख ४ लाख रुपये असा एकूण १३ लाख रुपयांचा ऐवज पळविला.डॉ. बुरांडे यांच्या घरी यापूर्वी एकवेळ दरोडा व दागिण्यांची चोरी असे दोन वेळा चोरीचे प्रकार घडले होते. या झालेल्या चोरीपैकी एकाही चोरीचा तपास लावण्यास पोलिसांना यश आले नाही. मात्र १७ जूनच्या पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी १३ लाख रुपयांचा ऐवज पळवून नेल्याने शहरात खळबळ उडाली आहे. डॉ. बुरांडे यांचे चिरंजीव जगदीश बुरांडे हे १७ जूनच्या पहाटे २ वाजता उठून त्यांनी घरात फेरी मारली. पाणी पिऊन ते नेहमीच्या खोलीत झोपण्याऐवजी दुसऱ्या खोलीत झोपले. चोरट्यांनी घराच्या पश्चिमेकडील चॅनलगेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळविला. नेहमीच्या झोपण्याच्या खोलीत असलेले कपाट फोडून चोरट्यांनी त्यातील दागिणे चोरली. खोलीतील सामान दागिणे शोधताना अस्तव्यस्थ टाकून दिली. तसेच स्वंयपाकघराला लागून असलेल्या देवघरात ठेवलेले दागिणेही चोरट्यांनी पळवून नेले. घरातील आणखी दोन खोल्यात कपडे अस्ताव्यस्थ टाकून दिले. डॉ. बुरांडे झोपलेल्या खोलीतही चोरट्यांनी ऐवजाची शोधाशोध केली. परंतु, त्यांना काही हाती लागले नाही. जदगीश बुरांडे यांनी सोनपेठ पोलिसात फिर्याद देऊन त्यात ३५ तोळे सोने किंमत ९ लाख रुपये व रोख ४ लाख रुपये पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी श्वानपथक मागविले. परंतु, चोरट्यांचा मागमूस लागला नाही. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. बऱ्याच दिवसांनी चोरट्यांनी मोठी चोरी करुन पोलिसांना आव्हान उभे केले आहे. (वार्ताहर)कर्मचाऱ्यांना सवलतपरभणी: २० जून रोजी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. ही निवडणूक शुक्रवारी आल्यामुळे कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी असणार नाही. ज्या मतदारांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे, त्यांच्यासाठी चार तासाची सवलत दिली जाणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी सोयीच्या वेळेत मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सिंह यांनी केले आहे.यापूर्वीही झाली होती चोरीसोनपेठ येथील डॉ.बुरांडे यांच्या घरी यापूर्वीही चोरीचे प्रकार घडले आहेत. या परिसरात नेहमीच चोरीचे प्रकार घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरी झाल्यानंतर श्वानपथकास पाचारण करण्यात आले. परंतु, त्यात यश आले नाही. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.