शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

तेरा लाखांची धाडसी चोरी

By admin | Updated: June 18, 2014 01:26 IST

सोनपेठ: येथील बुरांडेनगरातील डॉ. मधुकरराव बुरांडे यांच्या घरी १७ जून रोजी पहाटे झालेल्या चोरीत चोरट्यांनी घराच्या चॅनलगेट व घरातील खोल्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून

सोनपेठ: येथील बुरांडेनगरातील डॉ. मधुकरराव बुरांडे यांच्या घरी १७ जून रोजी पहाटे झालेल्या चोरीत चोरट्यांनी घराच्या चॅनलगेट व घरातील खोल्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून ३५ तोळे सोने व रोख ४ लाख रुपये असा एकूण १३ लाख रुपयांचा ऐवज पळविला.डॉ. बुरांडे यांच्या घरी यापूर्वी एकवेळ दरोडा व दागिण्यांची चोरी असे दोन वेळा चोरीचे प्रकार घडले होते. या झालेल्या चोरीपैकी एकाही चोरीचा तपास लावण्यास पोलिसांना यश आले नाही. मात्र १७ जूनच्या पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी १३ लाख रुपयांचा ऐवज पळवून नेल्याने शहरात खळबळ उडाली आहे. डॉ. बुरांडे यांचे चिरंजीव जगदीश बुरांडे हे १७ जूनच्या पहाटे २ वाजता उठून त्यांनी घरात फेरी मारली. पाणी पिऊन ते नेहमीच्या खोलीत झोपण्याऐवजी दुसऱ्या खोलीत झोपले. चोरट्यांनी घराच्या पश्चिमेकडील चॅनलगेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळविला. नेहमीच्या झोपण्याच्या खोलीत असलेले कपाट फोडून चोरट्यांनी त्यातील दागिणे चोरली. खोलीतील सामान दागिणे शोधताना अस्तव्यस्थ टाकून दिली. तसेच स्वंयपाकघराला लागून असलेल्या देवघरात ठेवलेले दागिणेही चोरट्यांनी पळवून नेले. घरातील आणखी दोन खोल्यात कपडे अस्ताव्यस्थ टाकून दिले. डॉ. बुरांडे झोपलेल्या खोलीतही चोरट्यांनी ऐवजाची शोधाशोध केली. परंतु, त्यांना काही हाती लागले नाही. जदगीश बुरांडे यांनी सोनपेठ पोलिसात फिर्याद देऊन त्यात ३५ तोळे सोने किंमत ९ लाख रुपये व रोख ४ लाख रुपये पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी श्वानपथक मागविले. परंतु, चोरट्यांचा मागमूस लागला नाही. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. बऱ्याच दिवसांनी चोरट्यांनी मोठी चोरी करुन पोलिसांना आव्हान उभे केले आहे. (वार्ताहर)कर्मचाऱ्यांना सवलतपरभणी: २० जून रोजी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. ही निवडणूक शुक्रवारी आल्यामुळे कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी असणार नाही. ज्या मतदारांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे, त्यांच्यासाठी चार तासाची सवलत दिली जाणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी सोयीच्या वेळेत मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सिंह यांनी केले आहे.यापूर्वीही झाली होती चोरीसोनपेठ येथील डॉ.बुरांडे यांच्या घरी यापूर्वीही चोरीचे प्रकार घडले आहेत. या परिसरात नेहमीच चोरीचे प्रकार घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरी झाल्यानंतर श्वानपथकास पाचारण करण्यात आले. परंतु, त्यात यश आले नाही. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.