लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी तालुक्यातील पानशेंद्रा येथील तेरा शेतक-यांनी गुरुवारी आपली जमीन शासनाला विक्री केली. येथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयात थेट वाटाघाटीने ही खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.समृद्धीसाठी जमीन खरेदीच्या प्रक्रियेला जालना, बदनापूर तालुक्यात वेग येत असून, शहरालगत असलेल्या पानशेंद्रा व जामवाडी भागात जमिनीचा दर सर्वाधिक आहे. आता कमी क्षेत्र जात असलेल्या शेतक-यांनी जमीन देण्यास सहमती दर्शवली आहे. गुरुवारी १३ शेतक-यांनी आठ हेक्टर ३२ आर जमीन शासनाला विक्री केली. दोन दिवसांपूर्वी बदनापूर येथील १८ शेतक-यांनी समृद्धीसाठी जमीन दिली आहे. बदनापूर दुय्यम निबंधक कार्यालयात ही प्रक्रिया पूर्ण झाली. जमिनीचा मोबदला आरटीजीएसद्वारे थेट शेतकºयांच्या खात्यात जमा केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पानशेंद्र्यातील तेरा शेतक-यांनी दिली जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:53 IST