शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

सौताडा यात्रेवर दुष्काळाचे सावटश्रावणातील तिसऱ्या

By admin | Updated: August 11, 2014 00:18 IST

पाटोदा : सौताडा येथे पाऊस नसल्याने धबधब्याचा प्रपातही थांबला असून यात्रेवर दुष्काळाचे सावट आहे़

पाटोदा : तालुक्यातील सौताडा येथे श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मोठी यात्रा भरते़ यावेळी मानाच्या घोड्याची मिरवणूक काढली जाते़ यावर्षी मात्र पाऊस नसल्याने धबधब्याचा प्रपातही थांबला असून यात्रेवर दुष्काळाचे सावट आहे़बीड आणि नगरच्या सीमेवर पाटोदा तालुक्यातील शेवटचे गाव सौताडा आहे़ येथे ५०० फूट खोलीची दरी असून हा निसर्गरम्य परिसर आहे़ प्रभु रामचंद्र वनवासात असताना त्यांचे वास्तव्य होते, अशी अख्यायिका आहे़ तसेच विचारणा नदीचा उगमही या भागात आहे़ ऐतिहासिक महत्व असलेल्या सौताडा येथे तिसऱ्या सोमवारी रामेश्वराची यात्रा भरते़ यात्रेनिमित्त मानाच्या शामकर्ण या घोड्याची मिरवणूक काढली जाते़यावर्षी मात्र पाऊस नसल्याने या यात्रेवर दुष्काळाचे सावट आहे़ येथील धबधबा अद्यापही वाहत नसल्याने येथील वातावरण शांतच आहे़ येथे यात्रेनिमित्त धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम होतात़ येथे यासाठी दूरदूरहून भाविक येत असतात़यावर्षी धबधबा वाहत नसल्याने पर्यटकांची संख्याही रोडावल्याचे दिसून आले़ येथे सोमवारी पूजा, अभिषेक व महाआरती होणार असल्याचे रामभाऊ सानप गुरुजी यांनी सांगितले़ दरम्यान येथील रामकुंडातही पुरेसे पाणी नसल्याने याचा परिणाम परिसरातील हिरवाईवर झाल्याचे दिसून येत आहे़ (वार्ताहर)दर्शनासाठी लागते भाविकांची रीघ