शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

तिसऱ्या दिवशीही ‘वरुण’कृपा

By admin | Updated: July 23, 2016 01:07 IST

बीड : यंदाच्या हंगामातील अद्यापपर्यंतचा पाऊस खरीपातील पिकांना पोषक राहिला आहे. गरजेच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने सर्व पिके फोफावलेली आहेत

बीड : यंदाच्या हंगामातील अद्यापपर्यंतचा पाऊस खरीपातील पिकांना पोषक राहिला आहे. गरजेच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने सर्व पिके फोफावलेली आहेत. असे असतानाही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने सर्वच्या सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे पाऊस आहे पण पाणी नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात २४२.३ मि.मी पावसाची नोंद शुक्रवारपर्यंत झाली आहे. खरीपपूर्व मशागतीनंतरच्या रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी टिफणी उचलल्या होत्या. पावसात सातत्य न राहिल्याने जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने पेरण्या झाल्या होत्या. सुरवातीच्या केवह शिरूरकासार आणि पाटोदा तालुक्यातचसरासरी क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. १५ जून नंतर झालेल्या पावसावर खरीपातील पेरण्यांनी वेग घेतला होता. नंतरच्या महिन्याभरातच सरासरी खरीप क्षेत्राचा टप्पा ओलांडत १०६ टक्यावर पेरण्या झाल्या होत्या. गतआठवड्यात पावसाने उघडीप दिली होती. याकाळात शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकती घेतली असून खाताचा मारा करताच पावसाने हजेरी लावल्याने खरिपातील सर्व पिके सध्या फोफावत आहेत. पिकांकरिता सध्याचे वातावरण पोषक असून पावसामुळे पिकांना कोणत्याही रोगराईचा धोका नसल्याचे कृषी उपसंचालक बी.एम.गायकवाड यांनी सांगितले आहे. असे असले तरी अर्धा पावसाळा उलटण्याची वेळ आली तरी जिल्ह्यातील १४४ प्रकल्प कोरडेच आहेत. सरासरीच्या ३१ टक्के पावसाची नोंद झाली असली तरी दमदार पाऊस नसल्याने प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालेलाच नाही. सध्याचा पेंडओलता पाऊस पिकाला चांगला असला दमदार पावसाची शेतकऱ्यांबरोब प्रशासनालाही प्रतिक्षा आहे. आजघडीला जिल्ह्यात साडेतीनशे टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे. (प्रतिनिधी)