शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जलपरीची तिसरी खेप

By admin | Updated: April 15, 2016 00:52 IST

लातूर : मिरजेहून कृष्णेचे पाणी घेऊन जलपरीने गुरुवारी तिसरी खेप पुर्ण केली़ लातूर रेल्वे स्थानकात ६ वाजता दहा वॅगन घेऊन ही

लातूर : मिरजेहून कृष्णेचे पाणी घेऊन जलपरीने गुरुवारी तिसरी खेप पुर्ण केली़ लातूर रेल्वे स्थानकात ६ वाजता दहा वॅगन घेऊन ही जलपरी पोहचली़ त्यानंतर रेल्वेस्थानकालगत असलेल्या विहीरीत पाणी उतरविण्यास प्रारंभ झाला असून,विहीरीतून टँकरद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी टाकले जात आहे़ तिसऱ्या खेपेलाही पाच लाख लिटर्स पाणी आणण्यात आले़लातूर शहरासाठी भंडारवाडी, माळकोंडजी, डोंगरगाव येथून ४० ते ५० लाख लिटर पाणी उपलब्ध केले जाते़ त्यामध्ये गुरुवारी पुन्हा रेल्वेने आलेल्या ५ लाख लिटर्स पाण्याची भर पडली आहे़ सदरील जलपरीने आलेले पाणी रेल्वे स्थानकाशेजारील एस़आऱदेशमुख यांच्या विहीरीत साठविण्यात येत असून तेथून ते पाणी आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरणासाठी नेले जात आहे़ जलशुद्धीकरणानंतर शहरातील विविध भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ गेल्या दोन दिवसांपासून जलपरीच्या फेऱ्या सुरु आहेत़ गुरुवारी सायंकाळी ६ वाजता जलपरीची तिसरी खेप आली असून रेल्वेस्थानकाशेजारील विहीरीत दहा वाघिनीतून सुमारे पाच लाख लिटर पाण्याची साठवणूक केली जात आहे़ या जलपरीचे आगमन होताच खा़सुनिल गाकवाड, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे, तहसीलदार संजय वारकड आदींनी जलपरीचे स्वागत केले़ जलपरितून पाणी उतरविण्याचा तिसरा टप्पा असल्याने कमी कालावधीत पाणी विहीरीत सोडण्यात आले असल्याचे रेल्वे स्थानकातील अधिकारी काळे यांनी सांगितले़