शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

जलपरीची तिसरी खेप

By admin | Updated: April 15, 2016 00:52 IST

लातूर : मिरजेहून कृष्णेचे पाणी घेऊन जलपरीने गुरुवारी तिसरी खेप पुर्ण केली़ लातूर रेल्वे स्थानकात ६ वाजता दहा वॅगन घेऊन ही

लातूर : मिरजेहून कृष्णेचे पाणी घेऊन जलपरीने गुरुवारी तिसरी खेप पुर्ण केली़ लातूर रेल्वे स्थानकात ६ वाजता दहा वॅगन घेऊन ही जलपरी पोहचली़ त्यानंतर रेल्वेस्थानकालगत असलेल्या विहीरीत पाणी उतरविण्यास प्रारंभ झाला असून,विहीरीतून टँकरद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी टाकले जात आहे़ तिसऱ्या खेपेलाही पाच लाख लिटर्स पाणी आणण्यात आले़लातूर शहरासाठी भंडारवाडी, माळकोंडजी, डोंगरगाव येथून ४० ते ५० लाख लिटर पाणी उपलब्ध केले जाते़ त्यामध्ये गुरुवारी पुन्हा रेल्वेने आलेल्या ५ लाख लिटर्स पाण्याची भर पडली आहे़ सदरील जलपरीने आलेले पाणी रेल्वे स्थानकाशेजारील एस़आऱदेशमुख यांच्या विहीरीत साठविण्यात येत असून तेथून ते पाणी आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरणासाठी नेले जात आहे़ जलशुद्धीकरणानंतर शहरातील विविध भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ गेल्या दोन दिवसांपासून जलपरीच्या फेऱ्या सुरु आहेत़ गुरुवारी सायंकाळी ६ वाजता जलपरीची तिसरी खेप आली असून रेल्वेस्थानकाशेजारील विहीरीत दहा वाघिनीतून सुमारे पाच लाख लिटर पाण्याची साठवणूक केली जात आहे़ या जलपरीचे आगमन होताच खा़सुनिल गाकवाड, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे, तहसीलदार संजय वारकड आदींनी जलपरीचे स्वागत केले़ जलपरितून पाणी उतरविण्याचा तिसरा टप्पा असल्याने कमी कालावधीत पाणी विहीरीत सोडण्यात आले असल्याचे रेल्वे स्थानकातील अधिकारी काळे यांनी सांगितले़