शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जलपरीची तिसरी खेप

By admin | Updated: April 15, 2016 00:52 IST

लातूर : मिरजेहून कृष्णेचे पाणी घेऊन जलपरीने गुरुवारी तिसरी खेप पुर्ण केली़ लातूर रेल्वे स्थानकात ६ वाजता दहा वॅगन घेऊन ही

लातूर : मिरजेहून कृष्णेचे पाणी घेऊन जलपरीने गुरुवारी तिसरी खेप पुर्ण केली़ लातूर रेल्वे स्थानकात ६ वाजता दहा वॅगन घेऊन ही जलपरी पोहचली़ त्यानंतर रेल्वेस्थानकालगत असलेल्या विहीरीत पाणी उतरविण्यास प्रारंभ झाला असून,विहीरीतून टँकरद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी टाकले जात आहे़ तिसऱ्या खेपेलाही पाच लाख लिटर्स पाणी आणण्यात आले़लातूर शहरासाठी भंडारवाडी, माळकोंडजी, डोंगरगाव येथून ४० ते ५० लाख लिटर पाणी उपलब्ध केले जाते़ त्यामध्ये गुरुवारी पुन्हा रेल्वेने आलेल्या ५ लाख लिटर्स पाण्याची भर पडली आहे़ सदरील जलपरीने आलेले पाणी रेल्वे स्थानकाशेजारील एस़आऱदेशमुख यांच्या विहीरीत साठविण्यात येत असून तेथून ते पाणी आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरणासाठी नेले जात आहे़ जलशुद्धीकरणानंतर शहरातील विविध भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ गेल्या दोन दिवसांपासून जलपरीच्या फेऱ्या सुरु आहेत़ गुरुवारी सायंकाळी ६ वाजता जलपरीची तिसरी खेप आली असून रेल्वेस्थानकाशेजारील विहीरीत दहा वाघिनीतून सुमारे पाच लाख लिटर पाण्याची साठवणूक केली जात आहे़ या जलपरीचे आगमन होताच खा़सुनिल गाकवाड, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे, तहसीलदार संजय वारकड आदींनी जलपरीचे स्वागत केले़ जलपरितून पाणी उतरविण्याचा तिसरा टप्पा असल्याने कमी कालावधीत पाणी विहीरीत सोडण्यात आले असल्याचे रेल्वे स्थानकातील अधिकारी काळे यांनी सांगितले़