शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सलग तिसर्‍यांदा अतिक्रमण काढले

By admin | Updated: May 27, 2014 00:56 IST

निलंगा : अतिक्रमण सलग तिसर्‍यांदा काढून पालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये विनाशुल्क भाजी विक्रेत्यांना दुकाने देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

निलंगा : निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील भाजी विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण सलग तिसर्‍यांदा काढून पालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये विनाशुल्क भाजी विक्रेत्यांना दुकाने देण्यात येणार असल्याचे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी चौकात लातूर-बीदर राज्यमार्गावर दूध डेअरी कम्पाऊंडलगत सुमारे शंभर-सव्वाशे भाजीविक्रेते व्यवसायासाठी बसतात. मात्र या परिसरात अतिक्रमण एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले असून, या अतिक्रमणामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होत आहे. परिणामी, नगरपालिकेच्या वतीने वारंवार नोटिसा देऊनही व दोनवेळा अतिक्रमण काढूनही भाजी विक्रेत्यांनी त्याच ठिकाणी ठाण मांडले आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सलग तिसर्‍यांदा सोमवारपासून भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमण कार्यक्षेत्रात नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. भाजीपाला विक्रेत्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील आनंदमुनी चौकात ४५ लाख रुपये खर्च करून भव्य दिव्य असे भाजी मार्केट उभे केले आहे. यामुळे भाजी विक्रेत्यांचा व्यवसाय सुरळीत होईपर्यंत नगरपालिकेच्या वतीने मोफत दुकाने देण्यात येणार आहेत, असे आश्वासन मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिले असूनही भाजी विक्रेते नवीन भाजी मार्केटमध्ये बसतच नाहीत. अतिक्रमण उठविल्यानंतर अन्य ठिकाणी भाजी विक्रीसाठी बसतात. त्यामुळे रहदारीस अडथळा होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे सलग दोनवेळा अतिक्रमण काढूनही भाजीपाला विक्रेत्यांवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे तिसर्‍यांदा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असल्याचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सांगितले. अतिक्रमण हटाव मोहिमेचे काम सोमवारी सुरू करण्यात आले असून, यामध्ये नगरपालिकेचे अधिकारी, २६ कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे २ कर्मचारी, पोलिस निरीक्षक औदुंबर खेडेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, चार पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. याबाबत विरोधी पक्षाच्या नगरसेविका वसुंधरा शिंगाडे यांनी शहराचा विस्तार छत्रपती शिवाजी चौकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाला. जुन्या शहरात केवळ २५ टक्के वस्ती आहे. नवीन विस्तारित ठिकाणी ७५ टक्के लोक राहतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी चौकातच नवीन भाजी मार्केटही केले असते तर नगरपालिकेचा खर्च वाचला असता. पैशाचा विनियोग व्यवस्थित झाला असता, असे मतही त्यांनी व्यक्त केले. (वार्ताहर) नवीन भाजी मार्केट गैरसोयीचे..! नवीन भाजी मार्केट मध्यवर्ती भाजी मार्केटपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शहरातील आनंदनगर, विश्वकर्मा पांचाळ कॉलनी, बँक कॉलनी, हाडगा नाका, सरस्वतीनगर या भागांतील नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी जाण्यासाठी अडचणीचे व लांब आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी जुन्या मार्केटमध्येच भाजी मार्केटची सोय कायम रहावी, अशी मागणी भाजी मार्केटमधील विक्रेत्यांनी केली आहे. अन्यथा पालिकेची हुकुमशाही पद्धतीने सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम मोडीत काढू, असा इशारा भाजी विक्रेत्यांनी दिला.