शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

हरयाणातील चोरट्यांनी एटीएमीमधून आणखी ५० हजार चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:04 IST

औरंगाबाद : हरयाणातील भुडवास मुलथान १० मेवात येथील दोन चोरट्यांनी शहरातील तीन बँकांच्या एटीएममध्ये फेरफार करीत पैसे चोरल्याची ...

औरंगाबाद : हरयाणातील भुडवास मुलथान १० मेवात येथील दोन चोरट्यांनी शहरातील तीन बँकांच्या एटीएममध्ये फेरफार करीत पैसे चोरल्याची कबुली आतापर्यंत दिली आहे. यात बँक ऑफ इंडियाच्या उस्मानपुरा भागातील एटीएममधून ५० हजार रुपये काढले असल्याची माहिती समोर आली आहे. बँकेच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून या भामट्यांविरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बीड बायपास परिसरातील पैठण रोडजवळील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये बिघाड करून ॲक्सिस बँकेच्या डेबिट कार्डचा वापर करून पैसे काढताना दोघांना बँकेच्या अधिकाऱ्यांसह सातारा पोलिसांनी अटक केली होती. दोन आरोपींमध्ये मोहम्मद याह्या खुर्शिद (२१) व जाकीर खुर्शिद (२३, रा. भुडवास मुलथान १०, मेवात, जि. नुह, हरियाणा) याचा समावेश आहे. या दोघांना सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. यात दोघांच्या चौकशीत त्यांनी बीओआय बँकेच्या एटीएममधून ५० हजार रुपये काढल्याची कबुली दिली आहे. यानुसार उस्मानपुरा भागातील मंडळ रोडवरील बँक ऑफ इंडियांच्या एटीएममध्ये दोघा आरोपींनी वडिलांच्या नावाने असलेल्या ॲक्सिस बँकेच्या डेबिट कार्डचा वापर करून एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड केला. हा बिघाड करून बँकेतून पाच वेळा ट्रान्झेक्शन करून प्रत्येक वेळी १० हजार रुपये प्रमाणे ५० हजार रुपये काढले असल्याची माहिती समोर आली. सातारा पोलिसांनी याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांना दिली. यानुसार अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, २४ जुलै रोजी एटीएममधून पैसे गेल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून कृष्णा तुपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही आरोपी सातारा पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची कोठडी संपल्यानंतर आरोपींचा ताबा उस्मानपुरा पोलिसांना मिळणार आहे.

चाैकट,

पैसे जाण्याकडे बँकांचे दुर्लक्ष

एटीएममधून फ्रॉड करून पैसे काढणारी टोळीच सक्रिय झालेली आहे. सायबर पोलिसांनी पकडलेल्या टोळीकडूनही शहरातील एसबीआय बँकेच्या एटीएममधून १३ लाख रुपये चोरीला गेल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतरही हे प्रकार थांबलेले नाहीत. या पकडलेल्या चोरट्यांनी शहरातील तीन ठिकाणच्या एटीएममधून मागील काही दिवसांत पैसे काढले असल्याचे चौकशीत समोर आले आहे.