शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सात गावांची केली दिशाभूल

By admin | Updated: July 27, 2014 01:16 IST

सुनील चौरे, हदगाव तालुक्यातील त्या सात गावांसाठी आठवड्यातून दोन दिवसांसाठी महसूल मंडळ देण्याचे मान्य केले असून या ठिकाणी नायब तहसीलदार थांबणार आहेत.

सुनील चौरे, हदगावतालुक्यातील त्या सात गावांसाठी आठवड्यातून दोन दिवसांसाठी महसूल मंडळ देण्याचे मान्य केले असून या ठिकाणी नायब तहसीलदार थांबणार आहेत. परंतु ही सात गावे अर्धापूर तालुक्यात समाविष्ट करण्याच्या मागणीची शासनाकडून दिशाभूल करण्यात आल्याच्या प्रतिक्रिया सात गावांतील ग्रामस्थांतून उमटत आहेत.हदगाव तालुक्यातील अर्धापूरलगत असलेली निमगाव, रोडगी, चोरंबा, चाभरा, सोनाळा, खैरगाव व चाभरातांडा ही सात गावे अर्धापूर तालुक्याला जोडण्यासंदर्भात गत १५ वर्षांपासून मागणी सुरु आहे. या गावांसाठी हदगाव हे तालुक्याचे ठिकाण ४५ ते ५० किमी तर अर्धापूर ५ ते ७ किमी अंतरावर आहे. तहसील, पं. स. महसूल, कृषी तसेच इतर सर्वच कामांसाठी येथील ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. यामुळे वेळ व पैसा खर्च करुनही वेळेवर कामे होत नाहीत. याचा परिणाम विकासाच्या कोणत्याही योजना या गावापर्यंत पोहोचत नसल्याने सदर गावे विकासापासून कोसोदूर राहिली आहेत. तालुका बदलीच्या मागणीसाठी सात गावच्या शिष्टमंडळाने वेळोवेळी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांची भेट घेवून अडचणी सांगितल्या, परंतु त्यांच्या समस्या कोणीही ऐकायला तयार नाही. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेवून वेळोवेळी आंदोलने करुन प्रशासनापुढे महसूल अर्धापूर तालुक्याला जोडण्यासंदर्भात मागणी लावून धरली. यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच पालकमंत्री डी.पी.सावंत यांची भेट घेवून अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.यानंतर महसूलमंत्र्यांनी मुंबई येथे शिष्टमंडळाची बैठक बोलावून सदर सात गावांचे महसूल मंडळ अर्धापूरला जोडण्याचे अश्वासन दिले होते, मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर तालुका समावेशाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले होते. परंतु या गावांचा तालुका बदलायचा सोडाच तर महसूल मंडळही अर्धापूर तालुक्याला जोडले नाही. २६ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी हदगाव येथे घेतलेल्या आढावा बैठकीत सात गावांचा महसूल विभाग अर्धापूरला जोडणे शक्य नाही, त्यावर उपाय म्हणून नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी आठवड्यातील सोमवार व बुधवार असे दोन दिवस चाभरा व निमगाव येथे दिवसभर कर्तव्य बजावतील, अशी व्यवस्था केली आहे. यावेळी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सात गावांच्या कामकाजासाठी ्आठवड्यातून दोन दिवस नायब तहसीलदारांसह महसूल, पोलिस विभाग, पंचायत समिती, कृषीसह इतर विभागाचेही कर्मचारी थांबून जनतेची कामे करतील. - संतोष गोरड, तहसीलदार हदगाव