शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

अग्निशामक दलात ३ वाहने येणार

By admin | Updated: July 6, 2014 00:23 IST

जालना : येथील अग्निशामक दलात आणखी तीन गाड्या सामील होणार आहेत, अशी माहिती नगरपालिकेच्या अध्यक्षा पद्मा भरतिया यांनी दिली.

जालना : येथील अग्निशामक दलात आणखी तीन गाड्या सामील होणार आहेत, अशी माहिती नगरपालिकेच्या अध्यक्षा पद्मा भरतिया यांनी दिली. येथील अग्निशामक दलात सध्या ४ गाड्या आहेत. त्या चारही गाड्या सुस्थितीत आहेत. परंतु अग्निशामक दलाचे बळकटीकरण व्हावे म्हणून राज्य सरकारने या दलास आणखी चार गाड्या देण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ त्यासाठी खास तरतूदही केली. त्यात ३९ लाख रुपयांच्या तरतुदीतून ३ गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात औरंगाबाद येथील एका एजन्सीला आॅर्डरही देण्यात आली आहे.या दलात समाविष्ट होणारी ही तीनही वाहने अत्याधुनिक पध्दतीची असणार आहेत.विशेषत: या वाहनातील पाण्याच्या टाकीची क्षमता साडेचार हजार लिटर एवढी असणार असून या वाहनांची बांधणी सोलापूर येथे होणार आहे. येत्या १५ दिवसांच्या आत ही वाहने येथील अग्निशामक दलात सामील होतील, यामुळे शहरासह जिल्हावासीयांसाठी ही वाहने सहाय्यभूत ठरतील, असा विश्वास नगराध्यक्षा भरतिया यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.(प्रतिनिधी)आता कर्मचाऱ्यांचा प्रश्नयेथील अग्निशामक दलाचे बळकटीकरण होणार आहे. परंतु पहिल्या चार व नव्याने दाखल होणाऱ्या तीन अशा एकूण सात वाहनांकरिता पुरेसा कर्मचारीवर्ग नियुक्त करणे गरजेचे ठरणार आहे. सध्या या दलात २४ कर्मचारी कार्यरत आहेत.त्यात चालकांची संख्या सात एव्हढी आहे. एकूण सात वाहनांवर ४९ कर्मचाऱ्यांची गरज आहे. एका वाहनावर किमान सात कर्मचारी असावेत, असे सरकारचे संकेत आहेत. त्यामुळे २५ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी पालिका प्रशासनास राज्य सरकारकडून पाठपुरावा करीत मंजुरी आणावी लागणार आहे. तरच अग्निशामक दलाचे बळकटीकरण होईल.