शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

(चर्चा तर होणार...) सोशल मीडियावर कडक निर्बंध हवेत का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:02 IST

....................................................................................................................... कडक कायद्याची गरज ही गोष्ट खरीच आहे की, सोशल मीडियावर फेक न्यूज आणि बदनामीमूलक पोस्टचा धुमाकूळ सुरू ...

.......................................................................................................................

कडक कायद्याची गरज

ही गोष्ट खरीच आहे की, सोशल मीडियावर फेक न्यूज आणि बदनामीमूलक पोस्टचा धुमाकूळ सुरू असतो. एकीकडे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे, तर दुसरीकडे त्यावर कुणाचेच कडक नियंत्रण नाही. यासंदर्भात सध्या आहेत त्यापेक्षाही कडक कायदे बनविण्याची गरज आहे. चुकीची माहिती देणे, चारित्र्यहनन करणे, धार्मिक व जातीय भावना भडकावणे, हे कधीच हिताचे असू शकत नाही. त्यासाठी आणखी कडक कायद्याची गरज आहे.

- इम्तियाज जलील, खासदार, औरंगाबाद

.............................................................................................................

सध्याही कलम आहेतच

जातीय विद्वेष पसरविणे, धार्मिक भावना भडकाविणे, फेक न्यूज देणे, हे चुकीचेच आहे. याचे कोणीही समर्थन करणार नाही. त्यावर आळा घालण्यासाठी भादंवि २९५ व इतर कलमे आहेतच. आयटी कायद्यानुसार आरोपींविरुद्ध कारवाई होऊ शकते; परंतु आणखी कडक कायदे व नियम असायला हवेत.

-निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त, औरंगाबाद शहर

..........................................................................................

साेशल मीडियाचा अनधिकृत बाेभाटा

साेशल मीडियाच्या नावाखाली बेभान व बिनबुडाचा आधारहीन घटनांचा प्रसार वाढत चालला आहे. यावर शासनाचे नियंत्रण नाही आणि नियमनही नाही. यू-ट्यूबची कुबडी घेऊन पत्रकारिता मिरविणारे गल्लोगल्ली आपले अनधिकृत जाळे पसरवून जनसामान्यांना माेहजाळात ओढत आहेत, हे लाेकशाहीप्रणालीत धाेकादायक आहे. मध्यंतरी केंद्रीय माहिती प्रसारण विभागाने यू-ट्यूब न्यूज पाेर्टलची खातरजमा करावयास सुरुवात केली. त्याचे पुढे काय झाले, हे माहीत नाही.

-रामचंद्र देठे, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, औरंगाबाद

....................................................................................................................

बेछूट सोशल मीडियावर निर्बंध हवेतच

सध्या सोशल मीडिया बेछूटच आहे. त्यावर निर्बंध हवेतच. यासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्याची गरज आहे. मोबाइल कंपन्यांवरही कुणाचे नियंत्रण दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली चिंता खरी असून, त्यावर गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे.

-चंद्रकांत ठोंबरे, विधिज्ञ, औरंगाबाद खंडपीठ

.........................................................................