शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

स्मशानभूमीत शेड नसल्याने अंत्यविधी करावा लागला खुलताबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:05 IST

खुलताबाद : सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या टाकळी राजेराय गावात अनेक समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. येथील स्मशानभूमीत पत्र्याचे ...

खुलताबाद : सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या टाकळी राजेराय गावात अनेक समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. येथील स्मशानभूमीत पत्र्याचे शेड नसल्यामुळे एकाद्याचा अंत्यविधी करण्यासाठी गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तरी देखील कुंभकर्णी झोेपेत असलेले जिल्हा परिषद प्रशासन स्मशानभूमीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे.

टाकळी राजेराय येथील उमेश सेवेकर (वय ७४) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यात विजेचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस सुरू झाल्यामुळे गावातील स्मशानभूमीत अंत्यविधी कसा करायचा, असा यक्षप्रश्न नातेवाइकांना पडला. उपसरपंच गुलाब कुचे, आबाजी तांदळे, विलास साकळकर यांनी खुलताबादचे उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक योगेश बारगळ यांच्याशी संपर्क साधून खुलताबाद येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्याची परवानगी घेतली. त्यानंतर खुलताबाद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारानंतर गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. एवढे मोठे गाव असूनदेखील येथील स्मशानभूमीची दुरुस्ती कशी होत नाही, शेड उभारण्यासाठी जिल्हा परिषदेकडून निधी दिला जात नाही का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पाठपुरावा करूनही निधी मिळेना

पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे स्मशानभूमीतील शेडसाठी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. तरी देखील निधी दिला जात नाही. पावसाळ्यात अंत्यविधीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषदेने याची दखल घ्यावी, अशी मागणी उपसरपंच गुलाब कुचे, आबाजी तांदळे, विलास साकळकर, किशोर टाकळकर, कडुबा भागडे, सांडू जाधव, रमेश करपे, संकेत खंडेलवाल, काकासाहेब करपे, अमोल जोशी यांनी केली आहे, तर जिल्हा परिषद सदस्य एल. जी. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, एका महिन्यात येथील स्मशानभूमीत शेड उभारण्याचे काम हाती घेतले जाईल.