शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

स्मशानभूमीत शेड नसल्याने अंत्यविधी करावा लागला खुलताबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:05 IST

खुलताबाद : सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या टाकळी राजेराय गावात अनेक समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. येथील स्मशानभूमीत पत्र्याचे ...

खुलताबाद : सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या टाकळी राजेराय गावात अनेक समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. येथील स्मशानभूमीत पत्र्याचे शेड नसल्यामुळे एकाद्याचा अंत्यविधी करण्यासाठी गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तरी देखील कुंभकर्णी झोेपेत असलेले जिल्हा परिषद प्रशासन स्मशानभूमीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे.

टाकळी राजेराय येथील उमेश सेवेकर (वय ७४) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यात विजेचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस सुरू झाल्यामुळे गावातील स्मशानभूमीत अंत्यविधी कसा करायचा, असा यक्षप्रश्न नातेवाइकांना पडला. उपसरपंच गुलाब कुचे, आबाजी तांदळे, विलास साकळकर यांनी खुलताबादचे उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक योगेश बारगळ यांच्याशी संपर्क साधून खुलताबाद येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्याची परवानगी घेतली. त्यानंतर खुलताबाद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारानंतर गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. एवढे मोठे गाव असूनदेखील येथील स्मशानभूमीची दुरुस्ती कशी होत नाही, शेड उभारण्यासाठी जिल्हा परिषदेकडून निधी दिला जात नाही का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पाठपुरावा करूनही निधी मिळेना

पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे स्मशानभूमीतील शेडसाठी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. तरी देखील निधी दिला जात नाही. पावसाळ्यात अंत्यविधीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषदेने याची दखल घ्यावी, अशी मागणी उपसरपंच गुलाब कुचे, आबाजी तांदळे, विलास साकळकर, किशोर टाकळकर, कडुबा भागडे, सांडू जाधव, रमेश करपे, संकेत खंडेलवाल, काकासाहेब करपे, अमोल जोशी यांनी केली आहे, तर जिल्हा परिषद सदस्य एल. जी. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, एका महिन्यात येथील स्मशानभूमीत शेड उभारण्याचे काम हाती घेतले जाईल.