शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

आरोग्य विभागाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:02 IST

(सिटी गेस्ट ) स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत मराठवाड्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचे एकही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले नाही. यामुळे ...

(सिटी गेस्ट )

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत मराठवाड्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचे एकही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले नाही. यामुळे येथील लोकांना हृदयशस्त्रक्रियेसाठी किंवा अन्य मोठ्या उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागते. हॉस्पिटल सोडा, पण आदिवासी भागात अनेक गावे अशी आहेत की, तिथे साधे प्राथमिक आरोग्य केंद्रही नाही. जिथे आरोग्य केंद्र आहे, तिथे तज्ज्ञ डॉक्टर, नर्स नाहीत. आरोग्य विभागात अपुरे मनुष्यबळ हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक सरकारे आली. पण मराठवाड्यातील आरोग्याचा अनुशेष काही भरून निघाला नाही.

मराठवाड्यात औरंगाबादमधील वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) अंतर्गत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू आहे. तसेच लातूर येथेही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. पण, ते अजून कार्यान्वित नाही. वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत रुग्णालय असतात. त्यात काही वैद्यकीय विभाग वाढवून सुपर स्पेशालिटी केले जाते. तिथे शिकावू डॉक्टर रुग्णांवर प्रॅक्टिस करतात. मात्र, मराठवाड्याला नाशिकप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाचे स्वतंत्र सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची आवश्यकता आहे. जिथे मध्यमवर्गीय, गरीब रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरमार्फत उपचार, शस्त्रक्रिया केले जाऊ शकतात. या मागणीकडे आजपर्यंत कोणत्याच सरकारने गांभीर्याने विचार केला नाही.

डॉ. बेलखोडे यांनी सांगितले की, मराठवाड्यात विशेषत: बीड, नांदेडसह अन्य इतर जिल्ह्यांतून स्थलांतराचे प्रमाण खूप मोठे आहे. ऊसतोड तसेच अन्य कामांमुळे सतत शेकडो कुटुंबे स्थलांतर करीत असतात. या कुटुंबातील महिला व मुलांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत. मासिक पाळी दरम्यान रोजंदारी बुडू नये म्हणून अनेक महिलांची गर्भपिशवी काढून घेण्यात आली आहे. या शिवाय भयानक काय असू शकते. याचीही कोणीच दखल घेत नाही.

गरीबांनाही आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबविली जाते. मात्र, या योजनेसाठी अनेक अटी, नियम ठेवण्यात आले आहेत. यामुळे अनेकांना त्याचा उपयोग होत नाही. आरोग्य योजनेत सर्वसामान्य आजारांचा समावेश करावा, ही मागणी आहे. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष केले जाते.

मराठवाड्यात २५ टक्के लहानमुले बीसीसी लसीपासून वंचित आहेत. कारण, आरोग्य केंद्रांतील नवीन नर्सला लस कशी व कुठे द्यावी, याचे प्रशिक्षण नाही. जिथे आरोग्य केंद्र आहे तिथे वीज बिल न भरल्याने लाईट कट केलेली आहे. बर्फ वितळल्यावर तिथे ठेवलेल्या लसींमध्ये गुणवत्ता राहत नाही, अशी मराठवाड्यातील आरोग्य यंत्रणेची गंभीर परिस्थिती आहे.