शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

शंभर गावे २६२ वाड्यांवर टंचाई

By admin | Updated: August 12, 2014 01:56 IST

बीड: सततच्या दुष्काळामुळे पाण्याचे उद्भव दिवसेंदिवस कमी होत आहेत. गत तीन वर्षांपासून पावसाने पाठ फिरविल्याने राज्यकर्त्यांपासून ते प्रशासनापर्यंत

बीड: सततच्या दुष्काळामुळे पाण्याचे उद्भव दिवसेंदिवस कमी होत आहेत. गत तीन वर्षांपासून पावसाने पाठ फिरविल्याने राज्यकर्त्यांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांच्या समोर टंचाईवर मात करण्याचे आवाहन उभा ठाकले आहे. आज स्थितीत आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यात १०९ गावे तर ७२ वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्याचा कालावधी लोटला तरी बीड जिल्ह्यात पिके जगण्यापुरता देखील पाऊस झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यात भेडसवू लागली आहे. आज स्थितीत या तीन तालुक्यांत जिल्हा प्रशासनाने ५९ बोअर तर ३७ विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. यापुढील काळात पाऊस पडला नाही तर ज्या बोअर व विहिरींना पाणी आहे. त्या अधिग्रहीत कराव्या लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. यापुढे पाऊस झाला नाही तर ज्या ठिकाणचे पाण्याचे उद्भव प्रशासनाने अधिग्रहीत केले आहेत. ते देखील आटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे.आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यातील १ लाख ७१ हजार २८६ नागरिकांना प्रशासन पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा करत आहे. वरील तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्प भरण्याइतका पाऊस पुढील आठ-दहा दिवसात नाही पडला तर गाव व वाड्यांच्या संख्येत दुप्पटीने भर पडणार असल्याचे चित्र सध्या तरी पहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)