शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

इथंही काही मिळत नाही!

By admin | Updated: April 21, 2016 00:35 IST

औरंगाबाद : ‘काँग्रेसच्या राजवटीत भ्रष्टाचार बोकाळला होता. दलितांवरचे अन्याय-अत्याचारही वाढले होते. त्यांना मला सत्तेवरून खेचायचे होते.

औरंगाबाद : ‘काँग्रेसच्या राजवटीत भ्रष्टाचार बोकाळला होता. दलितांवरचे अन्याय-अत्याचारही वाढले होते. त्यांना मला सत्तेवरून खेचायचे होते. एक दिवस बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले, रामदास तुमची भीमशक्ती आणि आमची शिवशक्ती एकत्रित येऊ या. तुमच्यामुळे ते काँग्रेसवाले सत्तेत येतात. तुमचा वापर करून घेतात आणि तुम्हाला काही देत नाहीत. आम्ही विचार केला. सर्वांशी चर्चा केली आणि भीमशक्ती- शिवशक्ती एकत्रित आली. होय, मी भाजपबरोबर आहे. नरेंद्र मोदीबरोबर आहे. तिकडे काँग्रेसवाल्यांनीही काही दिलं नव्हतं. इथंही काही मिळत नाही.... बघू या काही मिळतं का ते’ असे हताश उद्गार आज येथे रिपाइं (ए ) चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी काढले. ते भारत भीमयात्रेनिमित्त आमखास मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश रिपाइं (ए) चे कार्याध्यक्ष बाबूराव कदम हे होते. सायंकाळी या यात्रेचे औरंगाबादेत जोरदार स्वागत करण्यात आले. यानिमित्त शहरातून वाहन रॅली काढण्यात आली. बसल्या बसल्या परिस्थितीनुरूप तयार केलेल्या काव्यपंक्ती पेश करीत नेहमीप्रमाणे खा.आठवले यांनी आपले भाषण खुलविले. त्यांच्या शीघ्र कविता अनेकदा टिंगलीचा व चेष्टेचा विषय झालेला असतानाही आठवले यांनी या चारोळ्यांचाच सहारा घेत आपले म्हणणे थेट उपस्थितांना भिडविण्यात यश मिळविले. त्याबद्दल त्यांना शब्दाशब्दाला टाळ्यांचा प्रतिसादही मिळत गेला. ‘बघा, औरंगाबादेत कसा सुटला आहे थंड वारा,मी देत आहे बुलंद’ जयभीमचा नारा, भारत भीमयात्रेच्या माध्यमातून मी जागा करीत आहे भारत सारा आणि वाजविणार आहे दुश्मनांचे बारा’ अशा काव्यपंक्ती त्यांनी सादर करून सभेचा ताबा घेतला. ते म्हणाले, कोण म्हणतंय आम्ही बीजेपीसोबत आहोत. बीजेपी आमच्यासोबत आहे. या सभेत रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले यांचेही भाषण झाले. या सभेस आठवले यांचा मुलगा जित आठवले यांच्या बाजूलाच बसलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलण्याची हिंमत कुणाचीही नाही. संविधान आग आहे, हात लावाल तर जळून जाल’ असा स्पष्ट इशारा खा. रामदास आठवले यांनी यावेळी दिला. बाबूराव कदम, बी.एम. मामा चव्हाण, ब्रह्मानंद चव्हाण, शीलाताई गांगुर्डे, दौलत खरात, पप्पू कागदे, धम्मानंद मुंडे आदींची भाषणे झाली. रिपाइं एचे जिल्हाध्यक्षद्वय अरविंद अवसरमल व संजय ठोकळ यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद शेळके यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी, प्रतापसिंग बोदडे व नागसेन सावदेकर आदींनी एकापेक्षा एक सरस भीमगीते गायली. राजाभाऊ शिरसाट यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्रावण गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, नागराज गायकवाड, कुसुमताई खरात, पद्मावती शेळके, किशोर थोरात, विजय मगरे, सतीश गायकवाड, उमाकांत रणधीर, एस.एस. यादव, प्रशांत शेगावकर आदींनी या सभेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.