शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

जिल्ह्यात दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्याची चाचपणी अद्याप नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:05 IST

औरंगाबाद : महिन्यापूर्वी कोरोनामुक्त झालेल्या आणि पुढे कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावांत दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात पडताळणी ...

औरंगाबाद : महिन्यापूर्वी कोरोनामुक्त झालेल्या आणि पुढे कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावांत दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात पडताळणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. यासंदर्भात जिल्ह्यात १०२८ गावे कोरोनामुक्तीच्या वाटेवर असून ५२६ गावांत २८ दिवसांपासून एकही बाधित आढळून आलेला नाही. तरीही या गावांत दहावी-बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भातील पडताळणीच्या सूचना राज्य शासनाकडून नसल्याने प्रत्यक्ष वर्गात शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने जिल्हा पातळी १ मध्ये आल्याने सर्व निर्बंध हटले. त्यामुळे गेल्या वर्षी नववीत काही काळ प्रत्यक्ष वर्गात शिकलेल्या विद्यार्थ्यांना पुढे पुन्हा वर्गात बसून शिकण्याची इच्छा आहे. दोन शैक्षणिक वर्षांत वर्गोन्नत झालेल्या या विद्यार्थ्यांना आता दहावीच्या वर्गांच्या सुरुवातीकडे लक्ष लागले आहे. मात्र, जिल्ह्यात अद्याप २८१ गावांत कोरोनाचे संक्रमण हटलेले नाही. ५२६ गावांतील संक्रमण २८ दिवसांपूर्वी संपले तर २०४ गावांच्या वेशीवर कोराेनाला थोपविण्यात यश आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर दहावी, बारावीचे वर्ग कधी भरतात याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. अद्याप शहरात प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यासंदर्भात सूचना नसल्याने सध्यातरी शिक्षण ऑनलाइनच असणार आहे, असे महापालिकेचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितले.

चौकट...

अद्याप आदेश नाही

दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी अद्याप राज्य शासनाकडून किंवा शिक्षण विभागाकडून सूचना मिळालेल्या नाहीत. वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आल्यावर त्यानुसार पडताळणी करून वर्ग सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.