शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला विमा नसल्याने संताप

By admin | Updated: August 4, 2014 00:48 IST

विलास भोसले, पाटोदा राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत कांदा पिकाचा समावेश नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़

विलास भोसले, पाटोदाराष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत कांदा पिकाचा समावेश नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़ उसापेक्षा अधिक विम्याचा हप्ता कापसाला असल्याने शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे़राज्य सरकारचा कृषी विभाग आणि राष्ट्रीय पीक विमा योजना संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या कृषी पिकांना विमा कवच पुरवित आहे़ जिल्ह्यात कापूस, बाजरी, तीळ, तूर, भात, खरीप ज्वारी, भूईमुग, सोयाबीन, सूर्यफूल आदी पिकांना महसूल मंडळ निहाय विमा कवच दिलेले आहे़ असे असले तरी जिल्ह्यातील एकाही महसूल मंडळात कांद्याला विमा संरक्षण दिले नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़ जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षापासून शेतकरी विविध अडचणींचा सामना करीत आहे़ शेतकऱ्यांसमोर कधी दुष्काळ तर कधी गारपीटचे संकट असते़ यामुळे अनेकदा हातातोंडाशी आलेला घासही हिरावलेल्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत़ त्यामुळे शेतकरी आता दूध पोळाल्याने ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबित असल्याचे दिसून येत आहे़ एकीकडे शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा यासाठी अधिकाऱ्यांसह सर्वच प्रयत्न करीत आहेत़ यामुळे शेतकऱ्यांमध्येही जागृती निर्माण झाली असून शेतकरी पीक विमा भरण्यासाठी बँकेत गर्दीच गर्दी करीत असल्याचे चित्र जिल्हाभरात पहावयास मिळत आहे़ असे असले तरी दुसरीकडे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप शेकापचे भाई मोहन गुंड यांनी केला आहे़वास्तविक बीड जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत़ कांदा चाळ उभारण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे अनुदान दिले आहे़ तसेच कडा येथे कांदा खरेदी विक्रीची मोठी बाजारपेठ आहे़ विशेष म्हणजे कडा येथील या बाजारपेठेचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो़ त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी कॉ़ महादेव नागरगोजे यांच्यासह शेतकऱ्यांमधून केली जात आहे़कापूस पिकाला हेक्टरी २१ हजार २०० रुपयांचे संरक्षण देण्यात आले आहे़ ६० टक्के जोखीम स्तर असलेल्या या पिकाला तेरा टक्के सर्वसाधारण हप्ता आहे़ तर उसाला ८० टक्के जोखीम असून विमा हप्ता केवळ ८ टक्क्यांनीच आकारला जातो़ यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे मत प्रगतीशील शेतकरी राजाभाऊ देशमुख यांनी व्यक्त केले़ सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे त्यामुळे कांदा पिकाला विम्याचे संरक्षण द्यावे, कापूस पिकासाठी हप्ता कमी करावा, अशी मागणी कांदा उत्पादक विष्णुपंत घोलप यांनी केली आहे़ जिल्ह्यात २००८ मध्ये विदर्भापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या़ अशी वेळ येऊ नये यासाठी कांदा पिकाला तात्काळ विमा संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे़या संदर्भात तालुका कृषी अधिकारी व्ही़ एस़ बिनवडे म्हणाले की, शासकीय धोरणानुसार विमा हप्ता आकारला जातो़ शेतकऱ्यांचे म्हणणे वरिष्ठांना कळविण्यात येईल़कांद्यालाही द्यावे विमा कवच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होत असतानाही संरक्षण दिले जात नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूरउसाला जोखीम ८० टक्के व हप्ता ८ टक्के तर कपाशीला जोखीम ६० टक्के व हप्ता १३ टक्के़यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यावर दुजाभाव होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप