शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय मेळावा घेऊनही प्रतिसाद शून्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:13 IST

मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या वाढावी, त्यांना सन्मान मिळावा, उत्तम शिक्षण मिळावे आणि यामुळे सामाजिक स्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली आहे. नुकतेच या योजनेच्या प्रचारासाठी लाखो रुपये खर्चून महाराष्ट्रभर राज्यस्तरीय मेळावे घेण्यात आले; पण तरीही मिळालेल्या तुटपुंज्या प्रतिसादावरून मेळावा उपयोग शून्य ठरल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे.

ऋचिका पालोदकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या वाढावी, त्यांना सन्मान मिळावा, उत्तम शिक्षण मिळावे आणि यामुळे सामाजिक स्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली आहे. नुकतेच या योजनेच्या प्रचारासाठी लाखो रुपये खर्चून महाराष्ट्रभर राज्यस्तरीय मेळावे घेण्यात आले; पण तरीही मिळालेल्या तुटपुंज्या प्रतिसादावरून मेळावा उपयोग शून्य ठरल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे.एप्रिल २०१६ मध्ये पूर्वी सुरू असलेल्या ‘सुकन्या’ योजनेत काही बदल करण्यात आले आणि ती माझी कन्या भाग्यश्री म्हणून ओळखली जाऊ लागली. १ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाºया गटासाठी ही योजना होती. यामध्ये पहिल्या किंवा दुसºया मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलींच्या नावे ठराविक रक्कम ठेवली जाणार होती. या योजनेला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहून योजनेत पुन्हा एकदा बदल करण्यात आले. मूळ योजनेतील काही किचकट अटी काढून टाकण्यात आल्या आणि आॅगस्ट २०१७ पासून वार्षिक उत्पन्न ७ लाख ५० हजार आणि त्यापेक्षा कमी असणाºया सर्वांचा या योजनेत समावेश करण्यात आला.तरीही योजनेच्या प्रतिसादात फारसा फरक न पडल्याने योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी नोव्हेंबर महिन्यात लाखो रुपये खर्चून महाराष्ट्रात ठिकठिकाणी राज्यस्तरीय मेळावे घेण्यात आले. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी अशा सर्वांना या योजनेत सहभागी करून सांस्कृतिक माध्यमातून प्रबोधन करण्यात आले होते.या विभागातील अधिकाºयांच्या मते अंगणवाडीसेविका त्यांच्या विभागात सर्वत्र परिचित असल्यामुळे त्यांना या योजनेविषयी लोकांचे समुपदेशन करायचे तंत्र शिकवून त्यामार्फत योजनेचा प्रचार क रण्याची गरज आहे. ज्यांना एक किंवा दोन मुली आहेत आणि त्यानंतर तिसरे अपत्य होऊ न देण्याचा ज्यांनी निर्णय घेतला आहे, अशा सर्वांसाठीच ही योजना आहे.शासनाचे लोक आपल्यापर्यंत पोहोचत नसतील तर इच्छुक व्यक्ती स्वत: पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग किंवा तालुकास्तरावर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योजनेचा लाभ घेऊ शकतात. १ आॅगस्ट २०१७ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी योजना लागू आहे.