शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

राज्यस्तरीय मेळावा घेऊनही प्रतिसाद शून्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:13 IST

मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या वाढावी, त्यांना सन्मान मिळावा, उत्तम शिक्षण मिळावे आणि यामुळे सामाजिक स्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली आहे. नुकतेच या योजनेच्या प्रचारासाठी लाखो रुपये खर्चून महाराष्ट्रभर राज्यस्तरीय मेळावे घेण्यात आले; पण तरीही मिळालेल्या तुटपुंज्या प्रतिसादावरून मेळावा उपयोग शून्य ठरल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे.

ऋचिका पालोदकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या वाढावी, त्यांना सन्मान मिळावा, उत्तम शिक्षण मिळावे आणि यामुळे सामाजिक स्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली आहे. नुकतेच या योजनेच्या प्रचारासाठी लाखो रुपये खर्चून महाराष्ट्रभर राज्यस्तरीय मेळावे घेण्यात आले; पण तरीही मिळालेल्या तुटपुंज्या प्रतिसादावरून मेळावा उपयोग शून्य ठरल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे.एप्रिल २०१६ मध्ये पूर्वी सुरू असलेल्या ‘सुकन्या’ योजनेत काही बदल करण्यात आले आणि ती माझी कन्या भाग्यश्री म्हणून ओळखली जाऊ लागली. १ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाºया गटासाठी ही योजना होती. यामध्ये पहिल्या किंवा दुसºया मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलींच्या नावे ठराविक रक्कम ठेवली जाणार होती. या योजनेला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहून योजनेत पुन्हा एकदा बदल करण्यात आले. मूळ योजनेतील काही किचकट अटी काढून टाकण्यात आल्या आणि आॅगस्ट २०१७ पासून वार्षिक उत्पन्न ७ लाख ५० हजार आणि त्यापेक्षा कमी असणाºया सर्वांचा या योजनेत समावेश करण्यात आला.तरीही योजनेच्या प्रतिसादात फारसा फरक न पडल्याने योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी नोव्हेंबर महिन्यात लाखो रुपये खर्चून महाराष्ट्रात ठिकठिकाणी राज्यस्तरीय मेळावे घेण्यात आले. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी अशा सर्वांना या योजनेत सहभागी करून सांस्कृतिक माध्यमातून प्रबोधन करण्यात आले होते.या विभागातील अधिकाºयांच्या मते अंगणवाडीसेविका त्यांच्या विभागात सर्वत्र परिचित असल्यामुळे त्यांना या योजनेविषयी लोकांचे समुपदेशन करायचे तंत्र शिकवून त्यामार्फत योजनेचा प्रचार क रण्याची गरज आहे. ज्यांना एक किंवा दोन मुली आहेत आणि त्यानंतर तिसरे अपत्य होऊ न देण्याचा ज्यांनी निर्णय घेतला आहे, अशा सर्वांसाठीच ही योजना आहे.शासनाचे लोक आपल्यापर्यंत पोहोचत नसतील तर इच्छुक व्यक्ती स्वत: पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग किंवा तालुकास्तरावर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योजनेचा लाभ घेऊ शकतात. १ आॅगस्ट २०१७ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी योजना लागू आहे.