शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

१२८ गावांत अद्याप नाही नळयोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:04 IST

--- २८१ गावांतील नळयोजना कालबाह्य : जिल्ह्यात १५४२ शाळा, १९० अंगणवाड्यांना नळजोडणीची प्रतीक्षा --- औरंगाबाद : जिल्ह्यात १२८ गावांमध्ये ...

---

२८१ गावांतील नळयोजना कालबाह्य : जिल्ह्यात १५४२ शाळा, १९० अंगणवाड्यांना नळजोडणीची प्रतीक्षा

---

औरंगाबाद : जिल्ह्यात १२८ गावांमध्ये नळ योजना नाही. तसेच २८१ गावांतील नळयोजना कालबाह्य झालेल्या आहेत, तर १५४२ शाळा आणि १९० अंगणवाड्यांना अद्याप नळ कनेक्शन मिळालेले नाही. निधीअभावी रखडलेली ही कामे मार्गी लावण्यासाठी जलजीवन मिशनच्या कृती आराखड्यात मंजूर ४३० कोटींचा निधी मिळण्याकडे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांनी नुकतीच पाणी पुरवठ्याची बैठक घेतली. गावागावात पाणी पोहोचावे, यासाठी शासनाकडून अनेक पाणी योजना राबविल्या जातात. मात्र, औरंगाबाद तालुक्यातील अनेक गावांना शासनाच्या या पाणी पुरवठा योजनांची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. यातच जलजीवन मिशन ही अभिनव योजनादेखील अनेक गावांत पोहोचलेली नाही. यासंदर्भात आयोजित बैठकीस तालुक्यातील सर्व सरपंच, गटविकास अधिकारी, सर्व ग्रामसेवक तसेच सर्व खात्यांचे विभागप्रमुख यांची उपस्थिती होती. अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची माहिती ग्रामस्थांना तसेच गावगाडा चालविणाऱ्या पदाधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचलेली नाही. या योजनेंतर्गत प्रत्येक घराला ५५ लिटर पाणी मिळण्याची तरतूद आहे. मात्र, योजनेची माहितीच गावात पोहोचलेली नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांनी सर्वांची चांगलीच कानउघाडणी केली.