शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

‘पीटलाईन’शिवाय नवी रेल्वे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:26 IST

चिकलठाणा येथे पीटलाईन बनविण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पीटलाईनसाठी २४ रेल्वे बोगींची जागा आवश्यक असून, प्रत्यक्षात चिकलठाण्यात २० बोगींएवढीच जागा आहे. भविष्यात रेल्वेला २४ पेक्षा अधिक बोगी वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे जागेअभावी चिकलठाणा येथील पीटलाईन बारगळण्याचे संकट निर्माण झाले. परिणामी नव्या रेल्वेचा प्रवासही अवघड होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा येथे पीटलाईन बनविण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पीटलाईनसाठी २४ रेल्वे बोगींची जागा आवश्यक असून, प्रत्यक्षात चिकलठाण्यात २० बोगींएवढीच जागा आहे. भविष्यात रेल्वेला २४ पेक्षा अधिक बोगी वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे जागेअभावी चिकलठाणा येथील पीटलाईन बारगळण्याचे संकट निर्माण झाले. परिणामी नव्या रेल्वेचा प्रवासही अवघड होईल.चिकलठाणा येथे पीटलाईन करण्यासाठी ११ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर वर्षभरात पीटलाईनचे काम पूर्ण होईल. या एका पीटलाईनमुळे किमान तीन ते चार नव्या रेल्वे सुरू होतील, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी सप्टेंबरमध्ये औरंगाबाद दौºयात दिली होती. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी बुधवारी चिकलठाण्यात पीटलाईनच्या जागेची पाहणी केली. या पाहणीत पीटलाईनसाठी जागेची असलेली अडचण त्यांच्यासमोर आली.गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादहून दिल्ली, मुंबईसाठी नव्या रेल्वे सुरू होण्याची मागणी होत आहे. नवीन रेल्वे सुरूकरताना सुरक्षेच्या दृष्टीने देखभाल-दुरुस्ती महत्त्वाची आहे. पूर्णा येथील पीटलाईनवरून देखभाल-दुरुस्ती करून रेल्वे औरंगाबादला आणणे शक्य नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे नव्या रेल्वेची प्रतीक्षा औरंगाबादकरांना करावी लागत आहे. चिकलठाणा येथे पीटलाईन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यासाठी प्रारंभी जमीन, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि पाण्याची सुविधा असल्याचे सांगण्यात आले; परंतु त्यात आता जागेची अडचण असल्याचे सांगितले जात आहे. सध्या किमान २४ बोगींची रेल्वे धावते. त्यामुळे ४ बोगींसाठी एक एकर जागेची रेल्वेला आवश्यकता आहे. पीटलाईनअभावी नव्या रेल्वेसाठी आणखी वाट पाहण्याची वेळ प्रवाशांवर येणार असल्याचे दिसते.औरंगाबादेतच पीटलाईनपीटलाईनचा प्रस्ताव गेलेला आहे. त्यात २० बोगींची जागा असल्याचे नमूद आहे. हा प्रस्ताव प्रारंभी अवस्थेत असून, रेल्वे मंत्रालय निर्णय घेईल. चार बोगींच्या जागेसाठी ९० मीटर म्हणजे जवळपास एक एकर जागेची आवश्यकता आहे. राज्य सरकारकडून जमीन मिळाली नाही तर तसेच काम चालविले जाईल. तरीही काही अडचण आली तर औरंगाबादेत अन्य जागेत पीटलाईन केली जाईल. कुठेना कुठे पीटलाईन होईल.- त्रिकालज्ञ राभा, डीआरएम, नांदेड, दक्षिण मध्य रेल्वे