शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

गावस्तरावर दक्षता समित्याच नाहीत !

By admin | Updated: January 8, 2017 23:31 IST

लातूर रोजगार हमी योजनेमार्फत गावस्तरावर करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या देखरेखीसाठी दक्षता समित्या स्थापन करण्याच्या शासनाच्या आदेशाला ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखविली आहे.

आशपाक पठाण लातूररोजगार हमी योजनेमार्फत गावस्तरावर करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या देखरेखीसाठी दक्षता समित्या स्थापन करण्याच्या शासनाच्या आदेशाला ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखविली आहे. लातूर जिल्ह्यातील ७८७ ग्रामपंचायतींपैकी एकाही ग्रामपंचायतीने समिती स्थापन केली नाही. परिणामी, कामाची गुणवत्ता आणि देखरेख सरकारी अधिकाऱ्यांवरच अवलंबून आहे.केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर ग्रामपंचायतस्तरावर स्थानिक देखरेख व दक्षता समिती गठित करण्यात आली नाही. त्यामुळे रोहयोचे राज्याचे उपसचिव डॉ. प्रमोद शिंदे यांनी १३ आॅक्टोबर २०१६ रोजी अध्यादेश काढून सर्व जिल्हा परिषदांना गावस्तरावर समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा व गावस्तरावर डोकेदुखी नको म्हणून ग्रामपंचायतींनी केलेले दुर्लक्ष यामुळेच तीन महिने लोटले तरी अद्याप एकाही गावात समिती नियुक्त नाही. रोहयोची कामे कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानीप्रमाणेच केली जातात. अनेक ठिकाणी बोगस मजूर दाखवून यंत्राच्या सहाय्याने कामे करून घेतल्याचे प्रकार पुढे आले आहेत. गरजू मजुरांना रोजगार मिळावा. शिवाय, कामही गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठीच गावस्तरावर समिती गठित करण्याचे आदेश असतानाही याकडे ‘जाणीव’पूर्वक कानाडोळा करण्यात आला आहे. समिती गठित करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले असले तरी शासकीय अधिकारी किंवा ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे समित्या रखडल्याचे दिसून येत आहे.