शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

गावस्तरावर दक्षता समित्याच नाहीत !

By admin | Updated: January 8, 2017 23:31 IST

लातूर रोजगार हमी योजनेमार्फत गावस्तरावर करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या देखरेखीसाठी दक्षता समित्या स्थापन करण्याच्या शासनाच्या आदेशाला ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखविली आहे.

आशपाक पठाण लातूररोजगार हमी योजनेमार्फत गावस्तरावर करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या देखरेखीसाठी दक्षता समित्या स्थापन करण्याच्या शासनाच्या आदेशाला ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखविली आहे. लातूर जिल्ह्यातील ७८७ ग्रामपंचायतींपैकी एकाही ग्रामपंचायतीने समिती स्थापन केली नाही. परिणामी, कामाची गुणवत्ता आणि देखरेख सरकारी अधिकाऱ्यांवरच अवलंबून आहे.केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर ग्रामपंचायतस्तरावर स्थानिक देखरेख व दक्षता समिती गठित करण्यात आली नाही. त्यामुळे रोहयोचे राज्याचे उपसचिव डॉ. प्रमोद शिंदे यांनी १३ आॅक्टोबर २०१६ रोजी अध्यादेश काढून सर्व जिल्हा परिषदांना गावस्तरावर समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा व गावस्तरावर डोकेदुखी नको म्हणून ग्रामपंचायतींनी केलेले दुर्लक्ष यामुळेच तीन महिने लोटले तरी अद्याप एकाही गावात समिती नियुक्त नाही. रोहयोची कामे कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानीप्रमाणेच केली जातात. अनेक ठिकाणी बोगस मजूर दाखवून यंत्राच्या सहाय्याने कामे करून घेतल्याचे प्रकार पुढे आले आहेत. गरजू मजुरांना रोजगार मिळावा. शिवाय, कामही गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठीच गावस्तरावर समिती गठित करण्याचे आदेश असतानाही याकडे ‘जाणीव’पूर्वक कानाडोळा करण्यात आला आहे. समिती गठित करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले असले तरी शासकीय अधिकारी किंवा ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे समित्या रखडल्याचे दिसून येत आहे.