शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

गावस्तरावर दक्षता समित्याच नाहीत !

By admin | Updated: January 8, 2017 23:31 IST

लातूर रोजगार हमी योजनेमार्फत गावस्तरावर करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या देखरेखीसाठी दक्षता समित्या स्थापन करण्याच्या शासनाच्या आदेशाला ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखविली आहे.

आशपाक पठाण लातूररोजगार हमी योजनेमार्फत गावस्तरावर करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या देखरेखीसाठी दक्षता समित्या स्थापन करण्याच्या शासनाच्या आदेशाला ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखविली आहे. लातूर जिल्ह्यातील ७८७ ग्रामपंचायतींपैकी एकाही ग्रामपंचायतीने समिती स्थापन केली नाही. परिणामी, कामाची गुणवत्ता आणि देखरेख सरकारी अधिकाऱ्यांवरच अवलंबून आहे.केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर ग्रामपंचायतस्तरावर स्थानिक देखरेख व दक्षता समिती गठित करण्यात आली नाही. त्यामुळे रोहयोचे राज्याचे उपसचिव डॉ. प्रमोद शिंदे यांनी १३ आॅक्टोबर २०१६ रोजी अध्यादेश काढून सर्व जिल्हा परिषदांना गावस्तरावर समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा व गावस्तरावर डोकेदुखी नको म्हणून ग्रामपंचायतींनी केलेले दुर्लक्ष यामुळेच तीन महिने लोटले तरी अद्याप एकाही गावात समिती नियुक्त नाही. रोहयोची कामे कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानीप्रमाणेच केली जातात. अनेक ठिकाणी बोगस मजूर दाखवून यंत्राच्या सहाय्याने कामे करून घेतल्याचे प्रकार पुढे आले आहेत. गरजू मजुरांना रोजगार मिळावा. शिवाय, कामही गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठीच गावस्तरावर समिती गठित करण्याचे आदेश असतानाही याकडे ‘जाणीव’पूर्वक कानाडोळा करण्यात आला आहे. समिती गठित करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले असले तरी शासकीय अधिकारी किंवा ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे समित्या रखडल्याचे दिसून येत आहे.