शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

राष्ट्रीय पेयजलमध्ये २३२ योजना रखडलेल्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:56 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेत शासनाने हात आखडता घेतल्याने वेळेत आराखडे मंजूर न होण्यामुळे योजना वेळेत पूर्ण होत नव्हत्या. यंदा २३३ योजनांचा आराखडा वेळेत मंजूर झाला तरीही अजून निविदा प्रक्रियाच नसल्याचे मराठवाडाभर चित्र आहे. यात जुन्या २६६ योजना सुरू असल्या तरीही त्यापैकी २३२ कामे रखडलेली आहेत. तर ४१ पूर्ण झाली आहेत.

ठळक मुद्देमराठवाड्यातील चित्र : २३३ नव्या योजनांच्या काही जिल्ह्यांत निविदाही निघाल्या नाहीत, ४९ कोटी रुपयांचा निधी पडून

विजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रीय पेयजल योजनेत शासनाने हात आखडता घेतल्याने वेळेत आराखडे मंजूर न होण्यामुळे योजना वेळेत पूर्ण होत नव्हत्या. यंदा २३३ योजनांचा आराखडा वेळेत मंजूर झाला तरीही अजून निविदा प्रक्रियाच नसल्याचे मराठवाडाभर चित्र आहे. यात जुन्या २६६ योजना सुरू असल्या तरीही त्यापैकी २३२ कामे रखडलेली आहेत. तर ४१ पूर्ण झाली आहेत.मराठवाड्यात २0१0 पूर्वी भारत निर्माण योजनेत मंजूर व नंतर या योजनेत समाविष्ट केलेल्या ६६ गावे, वाड्यांच्या ६२ योजना आहेत. यापैकी ४ पूर्ण झाल्या आहेत. तर ५८ योजना अजूनही प्रलंबित आहेत. यात औरंगाबाद-१८, नांदेड-४, उस्मानाबाद-४, बीड-२४, लातूर-३, जालना-५ अशी जिल्हानिहाय स्थिती आहे. तर २0१0 नंतर मंजूर योजनांतील २0२ पैकी १४१ पूर्ण झाल्या आहेत. तर १६५ योजना प्रलंबित आहेत. यात सर्वात विदारक चित्र नांदेड जिल्ह्यात आहे. यामध्ये तब्बल ६३ योजना प्रलंबित आहेत. तर त्यापाठोपाठ ४९ योजनांसह बीडचा क्रमांक लागतो. याशिवाय औरंगाबाद-११, जालना-१४, परभणी-१५, हिंगोली-२, उस्मानाबाद-१0 व लातूर-४ अशी संख्या आहे.यापूर्वीच्या प्रलंबित योजनांचा आकडा हा यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. याचा योग्य धांडोळा घेतला तर ही बाब लक्षात येईल. योजना पूर्ण न होण्याची समस्या मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत आहे. या रखडलेल्या कामांवरून अनेकदा जि.प.च्या सभा गाजतात. मात्र कुठे अपहार, कुठे समिती काम करायला तयार नाही, कुठे कंत्राटदाराने रक्कम उचलून पलायन केले, जलस्त्रोताला पाणी लागले नाही, ज्याच्या शेतात विहीर केली त्यानेच योजनेवर कब्जा केला, चाचणीतच पाईपलाईन फुटली अशी शेकडो कारणे यामागे आहेत.मराठवाड्यातील १३६ पाणीपुरवठा योजनांमध्ये अपहार झाल्याचे विभागीय बैठकीत दिलेल्या अहवालात नमूद केलेच आहे. यात औरंगाबाद-२३, परभणी-६0, नांदेड-६, उस्मानाबाद-२, बीड-४४, लातूर-१ अशी जिल्हानिहाय स्थिती आहे. तर यात ११.१२ कोटींची रक्कम अडकली आहे. यापैकी ६0 प्रकरणांत तर गुन्हे दाखल झाले आहेत.अपहाराच्या रकमेतील फक्त ७0 लाख वसूल झाले. तर ६९ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. यातही काहीच जिल्ह्यांनी इमानेइतबारे आकडेवारी दिल्याचे दिसत आहे. काही जिल्ह्यांनी आकडेच दिले नाहीत.नवीन मंजूर झालेल्या योजनांत औरंगाबाद-१७, जालना-४६, परभणी-४, हिंगोली-१0, नांदेड-३४, उस्मानाबाद-४६, बीड-४७, लातूर-४२ अशी जिल्हानिहाय योजनांची संख्या आहे. यामध्ये २६२ गावे, वाड्यांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.या योजनांची कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणे गरजेचे होते. मात्र अजूनही काही जिल्ह्यांत ही प्रक्रियाच सुरू नसल्याचे दिसून येत आहे.शिवाय जुन्या प्रलंबित योजनांसाठी कारणांची यादी एवढी लांबलचक आहे की, त्या पूर्ण होणार नसतील तर ग्रामस्थांची तहान भागवायची कशी, यावर विचार होणे गरजेचे आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या असून मागील काही वर्षांत यावर काम होणे अपेक्षित होते.