शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

बुद्धानंतर सिद्धांत बाबासाहेबांचाच

By admin | Updated: January 15, 2016 00:12 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने ते विश्वमानव आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक आणि तत्त्वचिंतक डॉ. यशवंत मनोहर यांनी गुरुवारी येथे केले.

औरंगाबाद : गौतम बुद्धानंतर विश्वाच्या पुनर्रचनेचा सिद्धांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते विश्वमानव आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक आणि तत्त्वचिंतक डॉ. यशवंत मनोहर यांनी गुरुवारी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २२ वा नामविस्तार दिन गुरुवारी साजरा करण्यात आला. डॉ. मनोहर यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वपुनर्रचनेचा सिद्धांत’ या विषयावर व्याख्यान झाले. कुलगुरू डॉ. बी. ए.चोपडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपसचिव सिद्धार्थ खरात, कुलसचिव डॉ. महेंद्र शिरसाट, बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे यांच्यासह डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. सुहास मोराळे यांची विचारमंचावर उपस्थिती होती. डॉ. मनोहर म्हणाले, डॉ. आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण १९५६ मध्ये झाले. महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांची उंची आणि खोली वाढते आहे. त्यामुळे याच दिवशी विश्वमानवाच्या विचारांचा जन्म झाला असे मी मानतो. बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येकाने विचारांची उंची आणि बौद्धिक क्षमता वाढविण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी विश्वाचे कल्याण हाच विचार आयुष्यभर केला आणि तसे कामही केले. यावेळी डॉ. मनोहर यांनी लोकाग्रहास्तव ‘जपून रे माझ्या फिनिक्स पक्ष्यांनो जपून’ ही कविता सादर केली.यावेळी खरात यांनी, नामांतराच्या चळवळीचे धगधगते अग्निकुंड विझू न देता बाबासाहेबांचे विचार कृतीतून पुढे न्यावेत, असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. चोपडे म्हणाले, बाबासाहेबांच्या विचारांचे गारुड हजारो वर्षे माणसांच्या मनावर अधिराज्य करीत राहील. मागील २१ वर्षांत झालेल्या विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा डॉ. शिरसाट यांनी प्रास्ताविकात घेतला. डॉ. उत्तम अंभोरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मोराळे यांनी आभार मानले.