शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

बुद्धानंतर सिद्धांत बाबासाहेबांचाच

By admin | Updated: January 15, 2016 00:12 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने ते विश्वमानव आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक आणि तत्त्वचिंतक डॉ. यशवंत मनोहर यांनी गुरुवारी येथे केले.

औरंगाबाद : गौतम बुद्धानंतर विश्वाच्या पुनर्रचनेचा सिद्धांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते विश्वमानव आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक आणि तत्त्वचिंतक डॉ. यशवंत मनोहर यांनी गुरुवारी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २२ वा नामविस्तार दिन गुरुवारी साजरा करण्यात आला. डॉ. मनोहर यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वपुनर्रचनेचा सिद्धांत’ या विषयावर व्याख्यान झाले. कुलगुरू डॉ. बी. ए.चोपडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपसचिव सिद्धार्थ खरात, कुलसचिव डॉ. महेंद्र शिरसाट, बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे यांच्यासह डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. सुहास मोराळे यांची विचारमंचावर उपस्थिती होती. डॉ. मनोहर म्हणाले, डॉ. आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण १९५६ मध्ये झाले. महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांची उंची आणि खोली वाढते आहे. त्यामुळे याच दिवशी विश्वमानवाच्या विचारांचा जन्म झाला असे मी मानतो. बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येकाने विचारांची उंची आणि बौद्धिक क्षमता वाढविण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी विश्वाचे कल्याण हाच विचार आयुष्यभर केला आणि तसे कामही केले. यावेळी डॉ. मनोहर यांनी लोकाग्रहास्तव ‘जपून रे माझ्या फिनिक्स पक्ष्यांनो जपून’ ही कविता सादर केली.यावेळी खरात यांनी, नामांतराच्या चळवळीचे धगधगते अग्निकुंड विझू न देता बाबासाहेबांचे विचार कृतीतून पुढे न्यावेत, असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. चोपडे म्हणाले, बाबासाहेबांच्या विचारांचे गारुड हजारो वर्षे माणसांच्या मनावर अधिराज्य करीत राहील. मागील २१ वर्षांत झालेल्या विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा डॉ. शिरसाट यांनी प्रास्ताविकात घेतला. डॉ. उत्तम अंभोरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मोराळे यांनी आभार मानले.