शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

देशहित होते त्यांचे अंतिम उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:00 IST

महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. आंबेडकर, सुभाषचंद्र बोस ही सगळी मंडळी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्त्वांवर विश्वास ठेवणारी होती. या सगळ्यांचे एकमेकांशी असलेले नाते अत्यंत सेंद्रिय होते. ही मंडळी कधीही वैयक्तिक कारणासाठी एकमेकांशी भांडली नाहीत. देशहित हे सगळ्यांचे अंतिम उद्दिष्ट होते, पण त्यासाठीचे मार्ग वेगळे असल्यामुळे त्यांच्यात मतभेद होते. या नेत्यांचे अंतरिक संबंध समजून न घेता विनाकारण त्यांची प्रतिमा संकुचित करण्याचे धारिष्ट्य करू नये, अशा शब्दांत विश्वंभर चौधरी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

ठळक मुद्देविश्वंभर चौधरी : औरंगाबादेत फुले- शाहू- आंबेडकर व्याख्यानमालेस सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. आंबेडकर, सुभाषचंद्र बोस ही सगळी मंडळी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्त्वांवर विश्वास ठेवणारी होती. या सगळ्यांचे एकमेकांशी असलेले नाते अत्यंत सेंद्रिय होते. ही मंडळी कधीही वैयक्तिक कारणासाठी एकमेकांशी भांडली नाहीत. देशहित हे सगळ्यांचे अंतिम उद्दिष्ट होते, पण त्यासाठीचे मार्ग वेगळे असल्यामुळे त्यांच्यात मतभेद होते. या नेत्यांचे अंतरिक संबंध समजून न घेता विनाकारण त्यांची प्रतिमा संकुचित करण्याचे धारिष्ट्य करू नये, अशा शब्दांत विश्वंभर चौधरी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.देवगिरी महाविद्यालयातर्फे रविवारपासून आयोजित फुले- शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेस सुरुवात झाली. याचे पहिले पुष्प गुंफताना चौधरी यांनी ‘राष्ट्रनेत्यांचे अंतरंग’ हा विषय उलगडला. यादरम्यान त्यांनी म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नेत्यांच्या अंतरिक संबंधांवर प्रकाश टाकला. अ‍ॅड. शशिकुमार चौधरी अध्यक्षस्थानी होते. पंडितराव हर्षे, त्रिंबकभाऊ पाथ्रीकर यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांनी व्याख्यानमालेबद्दल माहिती दिली तर प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे यांनी प्रास्ताविक केले.चौधरी पुढे म्हणाले की, या राष्ट्रनेत्यांची पिढी ही शिक्षणातून पुढे आलेली होती, ‘फ्लेक्स’मधून नव्हे. गांधी या सगळ्या नेत्यांना घेऊन पुढे जाणारे नेते होते. त्यामुळे ते एक मध्यवर्ती सूत्रधार होते. राज्यघटना या सगळ्या राष्ट्रनेत्यांना एकत्र आणणारा शेवटचा धागा होता. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून या नेत्यांबद्दल अत्यंत उद्वेगजनक बोलले जाते. या नेत्यांचा इतिहास, मतभेदांचे संदर्भ नीट समजून घेऊन या नेत्यांबाबत बोला, असे आवाहनही त्यांनी या माध्यमातून के ले. पं. नेहरूंची भूमिका मांडताना ते म्हणाले की, आपल्याकडच्या एका वर्गाला आधुनिकतेचे वावडे होते आणि नेहरू हे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि विज्ञानवादी होते, त्यामुळेच त्यांना प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले. त्यांचा देशाप्रतीचा दानशूरपणा कधीही समोर न येता केवळ त्यांची श्रीमंती आणि अय्याशी व्यक्तिमत्त्वाच्या गप्पाच रंगवून सांगण्यात आल्या.सुभाषचंद्र बोस आणि नेहरू यांचे हिटलरची मदत घेण्यावरून वाद होते. त्यांचे के वळ वितुष्टच समोर येते, मात्र सुभाषचंद्रांच्या निधनानंतर आझाद हिंद सेनेचे पुनर्वसन नेहरूंनीच केले ही गोष्ट सांगितली जात नाही.आंबेडकर आणि गांधी हे एकमेकांना छेद न देणारे स्वतंत्र विचारप्रवाह होते. गांधीजींना आधी स्वातंत्र्य हवे होते तर आंबेडकरांना सामाजिक सुधारणा अगोदर पाहिजे होत्या, हा त्यांच्या वादाचा मुद्दा होता.आज (दि. १२) या व्याख्यानमालेदरम्यान सायं. ५.३० वा. डॉ. मोहन आगाशे ‘दैनंदिन जीवनातील ताणतणाव : आरोग्य आणि कलाक्षेत्राचे योगदान’ या विषयावर भाष्य करणार आहेत.बुद्धीपेक्षा पुतळ्याची उंची महत्त्वाची वाटू लागलीसरदार पटेलांविषयी बोलताना चौधरी म्हणाले की, सरदार पटेलांवर खूपच अन्याय झाला, असे आज बोलले जाते. आता तर त्यांचा सगळ्यात मोठा पुतळाही उभारण्यात येत आहे. चीनचे मेटल वापरून बनविण्यात येणारा हा पुतळा प्रत्यक्षात सरदार पटेलांनाही आवडेल की नाही माहीत नाही. पण बौद्धिक उंची संपली की पुतळ्याची उंचीच मोठी वाटते, असा टोलाही त्यांनी मारला.