शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंनी पाहिले, शिंदे आले; शेतक-यांना काही नाही मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:01 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गात ज्या शेतक-यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मात्र, त्यातून शेतकºयांच्या नशिबी खूप पडत नसून, उलट बांधाबांधावर मोबदल्यावरून प्रशासनाने भेदभाव सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गात ज्या शेतक-यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मात्र, त्यातून शेतकºयांच्या नशिबी खूप पडत नसून, उलट बांधाबांधावर मोबदल्यावरून प्रशासनाने भेदभाव सुरू केला आहे. फतियाबाद येथील एका जमिनीला ९२ लाख रुपये एकरी भाव मिळत आहे, तर दुसरीकडे बांधाच्या पलीकडील जमिनीला १२ लाख रुपये एकरी भाव दिला जात आहे.या भेदभावामुळे आणि तालुक्यांच्या हद्दीमुळे निर्माण झालेल्या तंट्यावरून शेतकºयांना गुरुवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनीही विनापरवानगी सभागृहात प्रवेश केल्यामुळे शेतकºयांवरच राग काढला. पालकमंत्री शेतकºयांना म्हणाले की, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे येऊन गेले. आणखी काय पाहिजे. त्यामुळे हवालदिल शेतकºयांना नाना पळसकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यात ठिय्या देत त्यांची वाट पाहण्यापलीकडे काहीही करता आले नाही. सभागृहातून बाहेर आल्यानंतर पालकमंत्री कदम यांनी त्यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण देत जिल्हाधिकारी कार्यालय सोडले.बाळू हेकडे, काशीनाथ हेकडे, शिवाजी भगत, धरमसिंग सुंदर्डे, कोंडिराम पल्हाळ यांनी फतियाबाद, माळीवाडा, दौलताबाद येथील जमिनींबाबत दरांमध्ये सुरू असलेला घोळ समोर आणला. दोन्ही बाजूंनी शेतकºयांची कोंडी होत आहे. ७० टक्के भूसंपादन जर प्रशासनाने केले, तर उर्वरित जमीन कायद्याने संपादित करून शेतकºयांना ठरविलेला मोबदलाच देईल. यामध्ये शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल.गुंतवणूकदारांच्या जमिनींना भावसमृद्धी महामार्गाची घोषणा होण्यापूर्वी वर्ष, सहा महिने आधी ज्या गुंतवणूकदारांनी कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या, त्यांना भूसंपादनातून मोठा मोबदला मिळू लागला आहे व जे पारंपरिक शेतकरी आहेत, त्यांचे नुकसान होत आहे. काही बड्या नेत्यांच्या जमिनी तर चारही बाजूंनी कॉर्नरवर आल्या आहेत. यामध्ये मातब्बरांचे कल्याण होत असून, प्रशासन शेतकºयांच्या बाजूने काहीही बोलण्यास तयार नसल्याचा आरोप बाळू हेकडे या शेतकºयाने केला. नेते येऊन गेले तरी शेतक-यांना न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.