शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

ठाकरेंनी पाहिले, शिंदे आले; शेतक-यांना काही नाही मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:01 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गात ज्या शेतक-यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मात्र, त्यातून शेतकºयांच्या नशिबी खूप पडत नसून, उलट बांधाबांधावर मोबदल्यावरून प्रशासनाने भेदभाव सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गात ज्या शेतक-यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मात्र, त्यातून शेतकºयांच्या नशिबी खूप पडत नसून, उलट बांधाबांधावर मोबदल्यावरून प्रशासनाने भेदभाव सुरू केला आहे. फतियाबाद येथील एका जमिनीला ९२ लाख रुपये एकरी भाव मिळत आहे, तर दुसरीकडे बांधाच्या पलीकडील जमिनीला १२ लाख रुपये एकरी भाव दिला जात आहे.या भेदभावामुळे आणि तालुक्यांच्या हद्दीमुळे निर्माण झालेल्या तंट्यावरून शेतकºयांना गुरुवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनीही विनापरवानगी सभागृहात प्रवेश केल्यामुळे शेतकºयांवरच राग काढला. पालकमंत्री शेतकºयांना म्हणाले की, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे येऊन गेले. आणखी काय पाहिजे. त्यामुळे हवालदिल शेतकºयांना नाना पळसकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यात ठिय्या देत त्यांची वाट पाहण्यापलीकडे काहीही करता आले नाही. सभागृहातून बाहेर आल्यानंतर पालकमंत्री कदम यांनी त्यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण देत जिल्हाधिकारी कार्यालय सोडले.बाळू हेकडे, काशीनाथ हेकडे, शिवाजी भगत, धरमसिंग सुंदर्डे, कोंडिराम पल्हाळ यांनी फतियाबाद, माळीवाडा, दौलताबाद येथील जमिनींबाबत दरांमध्ये सुरू असलेला घोळ समोर आणला. दोन्ही बाजूंनी शेतकºयांची कोंडी होत आहे. ७० टक्के भूसंपादन जर प्रशासनाने केले, तर उर्वरित जमीन कायद्याने संपादित करून शेतकºयांना ठरविलेला मोबदलाच देईल. यामध्ये शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल.गुंतवणूकदारांच्या जमिनींना भावसमृद्धी महामार्गाची घोषणा होण्यापूर्वी वर्ष, सहा महिने आधी ज्या गुंतवणूकदारांनी कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या, त्यांना भूसंपादनातून मोठा मोबदला मिळू लागला आहे व जे पारंपरिक शेतकरी आहेत, त्यांचे नुकसान होत आहे. काही बड्या नेत्यांच्या जमिनी तर चारही बाजूंनी कॉर्नरवर आल्या आहेत. यामध्ये मातब्बरांचे कल्याण होत असून, प्रशासन शेतकºयांच्या बाजूने काहीही बोलण्यास तयार नसल्याचा आरोप बाळू हेकडे या शेतकºयाने केला. नेते येऊन गेले तरी शेतक-यांना न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.