शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उसाकडे पाठ; दहा लाख रोपे पडून

By admin | Updated: July 18, 2016 01:04 IST

उमरगा : तालुक्यातील कलदेव लिबाळा, तुगाव, माडज, जकेकूर, बेळंब आदी भागातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर उसाची रोपे तयार केली.

उमरगा : तालुक्यातील कलदेव लिबाळा, तुगाव, माडज, जकेकूर, बेळंब आदी भागातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर उसाची रोपे तयार केली. मात्र, पुरेशा पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांनी तयार केलेल्या ऊसरानातील सरी मोडून खरिपाची पेरणी केली आहे. उसाच्या रोपाला मागणी नसल्याने तयार रोपांचे काय करायचे, झालेला खर्च कसा काढायचा, असे अनेक प्रश्न या शेतकऱ्यांसमोर सध्या उभे आहेत.मागील तीन वषार्पासून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ऊसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हे लक्षात घेऊन मुरुम येथील विठ्ठलसाई कारखान्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना जुनमध्ये उसाची रोपे देण्याचा निर्णय घेतला. कार्यक्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांकडे शेडनेट व पाणी उपलब्ध आहे त्यांनी ऊसाची रोपे तयार करण्याचे आवाहनही कारखान्याच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील कलदेव लिंबाळा येथील सुनील जकेकुरे यांच्यासह गिरजाप्पा बिराजदार (तुगाव) यांनी तीन लाख, सिताराम मारेकर (माडज) यांनी १ लाख, अविनाश थिटे (जकेकूर), विजय पाटील (बेळंब) यांनी प्रत्येकी दीड लाख तर अनिल बिराजदार (बेळंब) यांनी पन्नास हजार रोपांची निर्मिती केली. सुनील जकेकुरे यांनी आपल्या शेतात दीड लाख रुपये खर्च करून २८ गुंठ्यावर एप्रिल २०१६ मध्ये शेडनेटची उभारणी केली. त्यानंतर लागवडीसाठी लागणारे दीड बाय दोन फुटाचे ७० रोपे येणारे ट्रे व कोकोपीट खरेदी केले. जवळपास बेणे उपलब्ध होत नसल्याने उमरगा, लोहारा, तुळजापूर, औसा व अक्कलकोट या तालुक्यातील मिळेल त्या गावातून त्यांनी ऊसबेणे खरेदी केले. यासाठी स्वत:च्या गावातील व परिसरातील काळा लिंबाळा, कोराळ आदी गावातील मजूर लावून साडेपाच लाखापेक्षा जास्त खर्च करून तंत्रशुध्द पध्दतीने तब्बल तीन लाख रोपे तयार केली. परिसरातील शेतकऱ्यांना जवळपास उत्तम प्रतिची रोपे मिळतील व आपणालाही यातून आर्थिक मदत होईल, अशी या शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, संपूर्ण जून महिन्यात एकही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे कोणाच्याही विहिरीला अथवा बोअरवेलला पाणी आले नाही. परिणामी पुरेशा पावसाअभावी शेतकऱ्यांनीही उसाच्या सरी मोडून खरिपाची पेरणी करणे पसंत केल्याने रोपांना मागणी नाही. तयार केलेली ही रोपे पडून असल्याने शेतकरी धास्तावला आहे. (वार्ताहर)