शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

शेतकऱ्यांनी फिरविली रबी पीक विम्याकडे पाठ

By admin | Updated: January 6, 2015 01:10 IST

हतनूर : दरवर्षी खरीप, रबी हंगामातील पिकांचा विमा काढूनही पिकांच्या नुकसानभरपाईपोटी विमा मंजूर होत नसल्याने यंदा रबी पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

हतनूर : दरवर्षी खरीप, रबी हंगामातील पिकांचा विमा काढूनही पिकांच्या नुकसानभरपाईपोटी विमा मंजूर होत नसल्याने यंदा रबी पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. दुष्काळी परिस्थितीत पीक विम्यासंबंधी शेतकऱ्यांत वेळीच जनजागृती न केल्याने रबी पीक उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.खरीप हंगामातील कापूस, मका, बाजरी या पिकांचा जवळपास दोन हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. शेतकरी दुष्काळात होरपळत असतानाही पीक विम्यासंदर्भात काहीच हालचाल दिसत नाहीत. पीक विमा मंजूर होण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने शेतकऱ्यांचा याबाबत निराशाजनक सूर आहे. पीक विमा मंजूर होऊन नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पडेल की नाही, याविषयी साशंकता दिसत असल्याने शेतकऱ्यांचा खरीप पीक विमा भरण्यास निरुत्साह दिसून आला. पर्जन्यमान कमी, ५० पैशांच्या आत आणेवारी, घटलेले उत्पन्न या सर्व बाबी पीक विमा मंजूर होण्यासाठी अनुकूल असताना पीक विमा मंजूर होत नाही, हे एक कोडेच आहे.२०१२ या वर्षीसुद्धा आणेवारी कमी असताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी पिकांचा विमा भरला होता; तोही मंजूर न झाल्याने विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या हातात छदामही टेकवला नाही. यंदाही आठ लाख रुपये विम्यापोटी विमा कंपनीने गिळून टाकले, तरीही या वर्षीच्या खरीप व २०१२ च्या रबी पीक विम्याचे काय झाले, याबाबत शेतकऱ्यांना कुणीच मार्गदर्शन करीत नाही.कृषी विभागाने ३१ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत गहू, ज्वारी, हरभरा यासह इतर पिकांचा विमा भरण्याचे आवाहन केले होते; मात्र योजनेच्या अंतिम दिवसापर्यंत हतनूर शाखेअंतर्गत येणाऱ्या ८ ते १० खेड्यांतील एकाही शेतकऱ्याने पीक विमा योजनेत भाग घेतला नाही. कन्नड मंडळांतर्गत नव्हे, तर जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजेच ३ हजार २५० हेक्टर क्षेत्र असलेले शिवार आहे. रबीचा पेराही मोठ्या प्रमाणात आहे. गल्लाभरू विमा कंपनीच्या धोरणामुळे एकाही शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीतही रबी पीक विमा भरला नाही. पीक विम्याचे या पिकासाठी इतके पैसे भरा, याव्यतिरिक्त मंजूर होण्याचे निकष काय आहे, याबाबतीत कृषी विभागाच अनभिज्ञ आहे.