शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

चोख बंदोबस्तात टीईटीची परीक्षा

By admin | Updated: June 7, 2016 23:48 IST

औरंगाबाद : शहरातील २७ केंद्रांवर अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली. या परीक्षेसाठी ८ हजार ९७५ उमेदवार प्रविष्ट झाले होते.

औरंगाबाद : शहरातील २७ केंद्रांवर अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली. या परीक्षेसाठी ८ हजार ९७५ उमेदवार प्रविष्ट झाले होते. मात्र, आज प्रत्यक्षात ६ हजार ५५२ उमेदवारांनी परीक्षा दिली. तब्बल २ हजार ३२३ उमेदवारांनी या परीक्षेकडे पाठ फिरवली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने १६ जानेवारी रोजी राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली होती. त्यावेळी प्राथमिक शाळेसाठी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा सकाळच्या सत्रातला पेपर फुटला होता. शिक्षण विभागाने त्यामुळे तो पेपर रद्द केला होता. मंगळवारी ७ जून रोजी फुटलेल्या पेपरची फेर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी शहरात २७ परीक्षा केंद्रांवर २७ बैठे पथकांची बारीक नजर होती. ७ क्षेत्रीय अधिकारी आणि पोलिसांच्या निगराणीत कोषागारे कार्यालयातून सकाळी ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास प्रश्नपत्रिकांच्या पेट्या बाहेर काढण्यात आल्या. पोलीस बंदोबस्तातच प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे सर्व परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यात आले. एकूण ३६० कक्षांमध्ये ७४.१२ टक्के उमेदवारांनी ही परीक्षा दिली. यावेळी प्रत्येक कक्षावर १ याप्रमाणे ३६० समवेक्षक आणि ५ परीक्षा कक्षांसाठी १ या प्रमाणे ७२ पर्यवेक्षकांनी परीक्षेसाठी परिश्रम घेतले. परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे उपशिक्षणाधिकारी एन. के. देशमुख यांनी सांगितले.फेरपरीक्षा... प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी सांगितले की, १६ जानेवारी रोजी पहिला पेपर फुटला होता. तो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने रद्द करून आज मंगळवारी ७ जून रोजी त्यासंबंधीची फेरपरीक्षा घेतली. सर्व केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त, बैठे पथके, पर्यवेक्षक आणि क्षेत्रीय अधिकारी लक्ष ठेवून होते.