शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
3
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
4
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
5
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
6
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
7
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
8
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
10
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
11
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
12
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
13
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
14
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
15
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
16
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
17
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
18
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
19
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
20
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

जळकोट तालुक्यात भीषण चाराटंचाई

By admin | Updated: August 11, 2014 01:52 IST

जळकोट : तालुक्यातील ५० हजार जनावरांना चारा घालण्यासाठी पशुपालकांची दमछाक होत आहे़ तालुक्यातील ऊस उत्पादकांकडून ऊस

जळकोट : तालुक्यातील ५० हजार जनावरांना चारा घालण्यासाठी पशुपालकांची दमछाक होत आहे़ तालुक्यातील ऊस उत्पादकांकडून ऊस कारखान्याला देण्याऐवजी आता प्रत्येक सरी दोन हजार रुपये भावाने पशुपालकांना विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. जळकोट तालुका डोंगराळ भाग आहे़ तालुक्यात वाड्या-तांड्यांची मोठी संख्या आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पशुपालक जनावरांचे पालन करतात. प्रशासनाच्या यादीप्रमाणे म्हैस, गाय, भाकड जनावरे, शेळी-मेंढी आदी एकूण तालुक्यात ५० हजार जनावरांची संख्या आहे.तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून आॅगस्ट दरम्यान केवळ दोनवेळा पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकाबरोबरच चाऱ्याची उगवणही कमी प्रमाणात झाली आहे. आॅगस्ट महिन्यात दरवर्षी तालुक्यातील शेतकरी हिरवागार चाऱ्याची भारे शेतातून आणत आपल्या जनावरांना घालत असे. परंतु, शेतातच काही नाही, तर जनावरांना काय घालणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तालुक्यात गेल्यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणात झाला होता. त्यामुळे साठवण तलाव, पाझर तलाव तुडूंब भरले होते. पाणीसाठा भरपूर असल्याने शेतकऱ्यांनी तालुक्यात दोन हजार उसाची लागवड केली होती. परंतु, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे साठवण तलावात केवळ ८ टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे विहिरी, बोअरची पाणीपातळीत घट झाली. परिणामी, विहीर, बोअरचे पाणी आटले आणि ऊस उत्पादकांच्या तोंडाला आलेला ऊस वाळू लागला आहे.पावसाळा संपत आला. आता पाऊस पडणे शक्य नाही. त्याचबरोबर कारखाना सुरू झाल्यानंतर कारखान्याच्या मनावर ऊस उचलला जातो. त्यानंतर वजन होऊन धनादेशाने पैसे घ्यावे लागतात. तालुक्यात सध्या भीषण चाराटंचाई असल्यामुळे ऊस लागवड शेतकऱ्यांकडे पशुपालक ऊस तोडून घेण्यासाठी गर्दी करीत उसाची एक सरी दोन हजार भावाप्रमाणे नगदी पैसे देऊन बैलगाडी अथवा ट्रॅक्टरने जाग्यावरून घेऊन जात आहेत. त्यामुळे ऊस कारखान्याला देण्यासाठी व कारखाना घेऊन जाण्यासाठी होणारा त्रास दूर होत असल्याने ऊस उत्पादकही खुश होऊन पशुपालकांना ऊस देत आहेत.