शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

जळकोट तालुक्यात भीषण चाराटंचाई

By admin | Updated: August 11, 2014 01:52 IST

जळकोट : तालुक्यातील ५० हजार जनावरांना चारा घालण्यासाठी पशुपालकांची दमछाक होत आहे़ तालुक्यातील ऊस उत्पादकांकडून ऊस

जळकोट : तालुक्यातील ५० हजार जनावरांना चारा घालण्यासाठी पशुपालकांची दमछाक होत आहे़ तालुक्यातील ऊस उत्पादकांकडून ऊस कारखान्याला देण्याऐवजी आता प्रत्येक सरी दोन हजार रुपये भावाने पशुपालकांना विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. जळकोट तालुका डोंगराळ भाग आहे़ तालुक्यात वाड्या-तांड्यांची मोठी संख्या आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पशुपालक जनावरांचे पालन करतात. प्रशासनाच्या यादीप्रमाणे म्हैस, गाय, भाकड जनावरे, शेळी-मेंढी आदी एकूण तालुक्यात ५० हजार जनावरांची संख्या आहे.तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून आॅगस्ट दरम्यान केवळ दोनवेळा पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकाबरोबरच चाऱ्याची उगवणही कमी प्रमाणात झाली आहे. आॅगस्ट महिन्यात दरवर्षी तालुक्यातील शेतकरी हिरवागार चाऱ्याची भारे शेतातून आणत आपल्या जनावरांना घालत असे. परंतु, शेतातच काही नाही, तर जनावरांना काय घालणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तालुक्यात गेल्यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणात झाला होता. त्यामुळे साठवण तलाव, पाझर तलाव तुडूंब भरले होते. पाणीसाठा भरपूर असल्याने शेतकऱ्यांनी तालुक्यात दोन हजार उसाची लागवड केली होती. परंतु, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे साठवण तलावात केवळ ८ टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे विहिरी, बोअरची पाणीपातळीत घट झाली. परिणामी, विहीर, बोअरचे पाणी आटले आणि ऊस उत्पादकांच्या तोंडाला आलेला ऊस वाळू लागला आहे.पावसाळा संपत आला. आता पाऊस पडणे शक्य नाही. त्याचबरोबर कारखाना सुरू झाल्यानंतर कारखान्याच्या मनावर ऊस उचलला जातो. त्यानंतर वजन होऊन धनादेशाने पैसे घ्यावे लागतात. तालुक्यात सध्या भीषण चाराटंचाई असल्यामुळे ऊस लागवड शेतकऱ्यांकडे पशुपालक ऊस तोडून घेण्यासाठी गर्दी करीत उसाची एक सरी दोन हजार भावाप्रमाणे नगदी पैसे देऊन बैलगाडी अथवा ट्रॅक्टरने जाग्यावरून घेऊन जात आहेत. त्यामुळे ऊस कारखान्याला देण्यासाठी व कारखाना घेऊन जाण्यासाठी होणारा त्रास दूर होत असल्याने ऊस उत्पादकही खुश होऊन पशुपालकांना ऊस देत आहेत.