शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विमा योजनेस जुलअखेरपर्यंत मुदत

By admin | Updated: July 10, 2014 01:00 IST

उस्मानाबाद : केंद्र शासनाने सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.

उस्मानाबाद : राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामान आधारित पीक विमा योजना राबविण्यात आली. मात्र जुन जुलैच्या पावसाची वाट पाहण्याअगोदरच योजनेची मुदत संपल्याने शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळवता आला नाही. त्यामुळे केंद्र शासनाने सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०१४ पीक विमा ही योजना सर्व पिकांसाठी ऐच्छिक केली असून, कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता चलनाद्वारे बँकेत भरणे आवश्यक आहे. चालू हंगामात कर्ज वितरण राष्ट्रीयकृत बँकेकडून करण्यात आल्याने पीक विमा हप्ता शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत भरून आपले पीक संरक्षित करावे, असे आवाहनही कृषी अधिकारी तोटावार यांनी केले आहे. या योजनेमध्ये ६० ते ८० टक्के जोखीमस्तर ठेवण्यात आला आहे. पिकानुरुप दर हेक्टरी १३ हजार ते २ लाख ४२ हजारापर्यत विम्याचे संरक्षण कवच पिकांना लाभणार आहे. सोमवार ७ जुलै पासून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वीच्या योजनेत वंचित असलेल्या शेतक-यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेत ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मूग, तूर, भुईमूग, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल, कापूस व कांदा या पिकांचा समावेश केला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ज्या पिकाचा विमा उतरवयाचा आहे ते पीक शेतात पेरल्याबद्दल तलाठ्याचा पीक पेऱ्याचा दाखला, सातबारा आणि आठ अ च्या उताऱ्यासह नजीकच्या बँकेत हप्ता भरावा. या योजनेअंतर्गत अति अल्प व अल्प भूधारकांना विमा हप्त्याच्या १० टक्के सूट असून, त्यांनी विमा हप्त्यावरील दराच्या ९० टक्के प्रमाणे भरणा करावयाचे आहे. खरीप हंगामाकरिता उंबरठा उत्पादनाच्या किमंतीपर्यंत व उंबरठा उत्पादनापेक्षा जादा किमंतीपर्यंत प्रति हेक्टरी दिलेल्या रकमेवर पीक विमा हप्ता शेतकऱ्यांनी तातडीने भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही कृषी विभागाने कळविले आहे. (प्रतिनिधी)