शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
9
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
12
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
13
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
14
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
15
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
16
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
17
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
18
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
19
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
20
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

कृषी विमा योजनेस जुलअखेरपर्यंत मुदत

By admin | Updated: July 10, 2014 01:00 IST

उस्मानाबाद : केंद्र शासनाने सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.

उस्मानाबाद : राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामान आधारित पीक विमा योजना राबविण्यात आली. मात्र जुन जुलैच्या पावसाची वाट पाहण्याअगोदरच योजनेची मुदत संपल्याने शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळवता आला नाही. त्यामुळे केंद्र शासनाने सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०१४ पीक विमा ही योजना सर्व पिकांसाठी ऐच्छिक केली असून, कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता चलनाद्वारे बँकेत भरणे आवश्यक आहे. चालू हंगामात कर्ज वितरण राष्ट्रीयकृत बँकेकडून करण्यात आल्याने पीक विमा हप्ता शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत भरून आपले पीक संरक्षित करावे, असे आवाहनही कृषी अधिकारी तोटावार यांनी केले आहे. या योजनेमध्ये ६० ते ८० टक्के जोखीमस्तर ठेवण्यात आला आहे. पिकानुरुप दर हेक्टरी १३ हजार ते २ लाख ४२ हजारापर्यत विम्याचे संरक्षण कवच पिकांना लाभणार आहे. सोमवार ७ जुलै पासून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वीच्या योजनेत वंचित असलेल्या शेतक-यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेत ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मूग, तूर, भुईमूग, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल, कापूस व कांदा या पिकांचा समावेश केला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ज्या पिकाचा विमा उतरवयाचा आहे ते पीक शेतात पेरल्याबद्दल तलाठ्याचा पीक पेऱ्याचा दाखला, सातबारा आणि आठ अ च्या उताऱ्यासह नजीकच्या बँकेत हप्ता भरावा. या योजनेअंतर्गत अति अल्प व अल्प भूधारकांना विमा हप्त्याच्या १० टक्के सूट असून, त्यांनी विमा हप्त्यावरील दराच्या ९० टक्के प्रमाणे भरणा करावयाचे आहे. खरीप हंगामाकरिता उंबरठा उत्पादनाच्या किमंतीपर्यंत व उंबरठा उत्पादनापेक्षा जादा किमंतीपर्यंत प्रति हेक्टरी दिलेल्या रकमेवर पीक विमा हप्ता शेतकऱ्यांनी तातडीने भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही कृषी विभागाने कळविले आहे. (प्रतिनिधी)