शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

मुदती कर्ज योजना कागदावरच !

By admin | Updated: May 24, 2014 01:38 IST

हरी मोकाशे, लातूर दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणार्‍या काही जातींतील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावावा म्हणून गेल्या काही

हरी मोकाशे, लातूर दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणार्‍या काही जातींतील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावावा म्हणून गेल्या काही वर्षांपासून केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ (एऩएस़एफ़डी़सी़) अंतर्गत मुदती कर्ज योजना राबविण्यात येत आहे़ गेल्या दोन वर्षांपासून या योजनेतंर्गत जिल्ह्यातील ३४ गरजूंना कर्ज मंजूर होऊनही ते उपलब्ध करून देण्यात आले नाही़ विशेष म्हणजे या गरजूंकडून सहभाग म्हणून ५ टक्क्यांप्रमाणे ३ लाख ४२ हजार रुपये शासनाने आपल्या तिजोरीत जमा करुन घेतले आहेत़ गरीबीत जीवन जगणार्‍या प्रत्येक समाजातील नागरिकांच्या हाताला काम मिळावे़ तसेच तो कुठलाही उद्योग व्यवसाय करण्यास सक्षम असल्यास त्याला भांडवल पुरवून त्याची आर्थिक बाजू बळकट करावी म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मागासलेल्या जातींसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत़ समाजातील नवबौध्द, होलार, हिंदू खाटीक, भंगी या जातींतील नागरिकांची आर्थिक प्रगती कमकुवत असल्याने त्यांच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ (एऩसी़एफ़डी़सी़) अंतर्गत मुदती कर्ज योजना राबविण्यात येत आहे़ या योजनेतंर्गत ५ लाख रुपयांचे कर्ज मिळते़ त्याची परतफेड ५ वर्षांत मासिक समान हप्त्यात करणे आवश्यक आहे़ तसेच कर्ज मंजूर झालेल्या व्यक्तीने ५ टक्के सहभाग भरणे बंधनकारक आहे़ केंद्राची ही योजना राज्यात राबविण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कार्यरत आहे़ लातूर जिल्ह्यात सन २००८ ते २०११ अखेरपर्यंत ९८ जणांची कर्ज प्रकरणे मंजूर होऊन तो शासनाकडून उपलब्धही करून देण्यात आला आहे़ मात्र सन २०१२ पासून अद्यापपर्यंत कर्ज मंजूर होऊनही त्याची रक्कम उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही़ सन २०१२ मध्ये ९ जणांच्या प्रकरणांपोटी १९ लाख रुपये मंजूर करण्यात आले़ या नागरिकांनी सहभागापोटी ९२ हजार रुपये शासनाकडे भरले आहेत़ सन २०१३ मध्ये २० जणांना ४१ लाख रुपये मंजूर झाले़ त्यामुळे या २० जणांनी १ लाख ९५ हजार रुपये सहभाग भरला आहे़ चालू २०१४ मध्ये ५ जणांना १० लाख रुपये मंजूर झाले असून त्यांनी ५० हजार रुपये सहभाग रक्कम भरली आहे़ सन २०११ अखेरपर्यंत या योजनेतंर्गत कर्ज मिळत होते़ त्यामुळे आपल्यालाही भांडवल मिळेल आणि उद्योग व्यवसाय उभारता येईल या आशेने गरजूंनी आर्थिक परिस्थिती नसतानाही उसनवारी करून सहभाग वाटा भरला आहे़ परंतु, गेल्या दोन वर्षांपासून मंजूर कर्ज मिळत नसल्याने या गरजूंची अडचण होत आहे़ त्यामुळे सहभाग वाटा भरलेल्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़योजनेतंर्गत मोठ्या प्रमाणात लाभ होत होता़ परंतु, सन २०१२ पासून शासनाकडून मंजूर कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नाही़ हे कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी संजय लातूरकर यांनी सांगितले़