शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

मुदती कर्ज योजना कागदावरच !

By admin | Updated: May 24, 2014 01:38 IST

हरी मोकाशे, लातूर दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणार्‍या काही जातींतील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावावा म्हणून गेल्या काही

हरी मोकाशे, लातूर दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणार्‍या काही जातींतील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावावा म्हणून गेल्या काही वर्षांपासून केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ (एऩएस़एफ़डी़सी़) अंतर्गत मुदती कर्ज योजना राबविण्यात येत आहे़ गेल्या दोन वर्षांपासून या योजनेतंर्गत जिल्ह्यातील ३४ गरजूंना कर्ज मंजूर होऊनही ते उपलब्ध करून देण्यात आले नाही़ विशेष म्हणजे या गरजूंकडून सहभाग म्हणून ५ टक्क्यांप्रमाणे ३ लाख ४२ हजार रुपये शासनाने आपल्या तिजोरीत जमा करुन घेतले आहेत़ गरीबीत जीवन जगणार्‍या प्रत्येक समाजातील नागरिकांच्या हाताला काम मिळावे़ तसेच तो कुठलाही उद्योग व्यवसाय करण्यास सक्षम असल्यास त्याला भांडवल पुरवून त्याची आर्थिक बाजू बळकट करावी म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मागासलेल्या जातींसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत़ समाजातील नवबौध्द, होलार, हिंदू खाटीक, भंगी या जातींतील नागरिकांची आर्थिक प्रगती कमकुवत असल्याने त्यांच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ (एऩसी़एफ़डी़सी़) अंतर्गत मुदती कर्ज योजना राबविण्यात येत आहे़ या योजनेतंर्गत ५ लाख रुपयांचे कर्ज मिळते़ त्याची परतफेड ५ वर्षांत मासिक समान हप्त्यात करणे आवश्यक आहे़ तसेच कर्ज मंजूर झालेल्या व्यक्तीने ५ टक्के सहभाग भरणे बंधनकारक आहे़ केंद्राची ही योजना राज्यात राबविण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कार्यरत आहे़ लातूर जिल्ह्यात सन २००८ ते २०११ अखेरपर्यंत ९८ जणांची कर्ज प्रकरणे मंजूर होऊन तो शासनाकडून उपलब्धही करून देण्यात आला आहे़ मात्र सन २०१२ पासून अद्यापपर्यंत कर्ज मंजूर होऊनही त्याची रक्कम उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही़ सन २०१२ मध्ये ९ जणांच्या प्रकरणांपोटी १९ लाख रुपये मंजूर करण्यात आले़ या नागरिकांनी सहभागापोटी ९२ हजार रुपये शासनाकडे भरले आहेत़ सन २०१३ मध्ये २० जणांना ४१ लाख रुपये मंजूर झाले़ त्यामुळे या २० जणांनी १ लाख ९५ हजार रुपये सहभाग भरला आहे़ चालू २०१४ मध्ये ५ जणांना १० लाख रुपये मंजूर झाले असून त्यांनी ५० हजार रुपये सहभाग रक्कम भरली आहे़ सन २०११ अखेरपर्यंत या योजनेतंर्गत कर्ज मिळत होते़ त्यामुळे आपल्यालाही भांडवल मिळेल आणि उद्योग व्यवसाय उभारता येईल या आशेने गरजूंनी आर्थिक परिस्थिती नसतानाही उसनवारी करून सहभाग वाटा भरला आहे़ परंतु, गेल्या दोन वर्षांपासून मंजूर कर्ज मिळत नसल्याने या गरजूंची अडचण होत आहे़ त्यामुळे सहभाग वाटा भरलेल्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़योजनेतंर्गत मोठ्या प्रमाणात लाभ होत होता़ परंतु, सन २०१२ पासून शासनाकडून मंजूर कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नाही़ हे कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी संजय लातूरकर यांनी सांगितले़