शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जाचक अटींमुळे शिक्षकांमध्ये तणावाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:15 IST

सलग १२ वर्षांची सेवा पूर्ण करणाºया शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ देण्यास प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली असून, चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी जातवैधता प्रमाणपत्र व संगणक परीक्षा (एमएससीआयटी) उत्तीर्ण असावी, ही अट लागू केल्यामुळे शिक्षकांच्या असंतोषाचा पारा चढला. तथापि, चटोपाध्याय वेतनश्रेणीची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, या मागणीसाठी शनिवारी ३०० शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सलग १२ वर्षांची सेवा पूर्ण करणाºया शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ देण्यास प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली असून, चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी जातवैधता प्रमाणपत्र व संगणक परीक्षा (एमएससीआयटी) उत्तीर्ण असावी, ही अट लागू केल्यामुळे शिक्षकांच्या असंतोषाचा पारा चढला. तथापि, चटोपाध्याय वेतनश्रेणीची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, या मागणीसाठी शनिवारी ३०० शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले.यासंदर्भात शिक्षणाधिकाºयांना सातत्याने निवेदने देण्यात आली. मात्र, चटोपाध्याय वेतनश्रेणीची प्रकरणे निकाली काढली जात नाहीत. राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी पात्र शिक्षकांना सदरील वेतनश्रेणी मान्य केली आहे; परंतु औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून गरज नसतानाही जातवैधता व संगणक परीक्षा (एमएससीआयटी) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आल्यामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत.महिनाभरापूर्वी शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी आठ दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते.शनिवारी दुपारी आंदोलनकर्ते शिक्षकांची भेट घेण्यासाठी शिक्षण सभापती मीनाताई शेळके, जि.प. सदस्या पुष्पाताई काळे व शिक्षणाधिकारी लाठकर या आंदोलन मंडपात आल्या. तेव्हाही शिक्षणाधिकारी लाठकर यांनी आठ दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शिक्षणाधिकारी लाठकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांना चटोपाध्याय वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षकांना जातवैधता प्रमाणपत्र व संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्राची अट पूर्ण करावी लागेल, असे सांगितले.त्यानंतर सदरील संतप्त शिक्षकांनी जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांची भेट घेऊन प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचे सांगितले.आंदोलनात कृती समितीचे किरण पाटील, नितीन पाटील, रमेश नप्ते, अनिल जगदाळे, रतन पवार, ईश्वर पावरा, प्रकाश दाणे, महेंद्र बारवाल, संतोष ताठे, दिलीप ढाकणे, विजय साळकर, प्रभाकर पवार, सदानंद माडेवार, मच्छिंद्र भराडे, गोविंद उगले, कैलास गायकवाड आदींसह विविध संघटनांचे जवळपास ३०० शिक्षक सहभागी झाले होते.शेवटी धरणे आंदोलनाचे सूत्रसंचालन जितेंद्र कोळी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नितीन पाटील यांनी मानले.अन्यथा साखळी उपोषण करणारच्यासंदर्भात कृती समितीच्या पदाधिकाºयांनी सांगितले की, प्रशासनाने शिक्षकांच्या संयमाचा अधिक अंत पाहू नये. येत्या आठ दिवसांत चटोपाध्याय वेतनश्रेणीचा प्रश्न निकाली निघाला नाही, तर नवव्या दिवसांपासून जि.प. मुख्यालयासमोर कृती समितीच्या वतीने शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू केले जाईल.