शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

'ओमायक्राॅनचे नाही, तर सिस्टिमचे टेन्शन'; स्वतःहून तपासणीस गेलेल्या दुबई रिटर्न ओमायक्राॅनगस्ताची आपबीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 13:20 IST

औरंगाबादेतही दुर्लक्ष, पण स्वत:हून केली चाचणी

औरंगाबाद : ‘मी जर स्वत:हून कोरोना तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात गेलो नसतो, तर मी कोरोनाबाधित आणि नंतर ओमायक्राॅनबाधित (Omicron Variant ) आहे, हे समोर आलेच नसते. कारण दिल्लीतील विमानतळावर माझी तपासणी झाली नाही, ना औरंगाबादेत. मला ओमायक्राॅनचे नाही, तर सिस्टिमचे टेन्शन आहे, अशी भावना दुबईहून परतलेल्या ३३ वर्षीय ओमायक्राॅनग्रस्त रुग्णाने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

या तरुणाला ओमायक्राॅनची बाधा झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. कोरोनाचे उपचार घेऊन हा रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होता. परंतु अहवाल प्राप्त होताच मनपाने त्यास उपचारासाठी पुन्हा भरती केले. ‘लोकमत’शी स्वत:हून संपर्क साधून हा रुग्ण म्हणाला, १७ डिसेंबरला दुबईहून दिल्लीत दाखल झालो. प्रवासापूर्वी ४८ तास आधीचा कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल होता. दिल्ली विमानतळावर केवळ ७ दिवसांचे क्वारंटाईन सांगण्यात आले, कोणतीही तपासणी झाली नाही. त्यानंतर शहरात दाखल झालो. येथेही विमानतळावर केवळ डोसची विचारणा करण्यात आली. घरी गेलो, पण थोडी सर्दी झालेली होती. कुटुंबीयांना काही त्रास नको, म्हणून १८ रोजी स्वत: एन-८ येथील केंद्रावर जाऊन कोरोना तपासणी केली. १९ तारखेला अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे खासगी रुग्णालयात भरती झालो. मी जर तपासणी केली नसती, तर हे समोर आलेच नसते. 'एचआरसीटी स्कोर' केवळ ३ होता. इतर तपासण्या नाॅर्मल आल्या. प्रकृती सुधारल्याने पाचव्या दिवशी सुटी झाली, असेही या रुग्णाने सांगितले.

निगेटिव्ह आल्याच्या दिवशीच ओमायक्राॅनचा अहवाल२५ डिसेंबर रोजी खासगी लॅबमध्ये पुन्हा कोरोना तपासणी केली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. परंतु याच दिवशी ओमायक्राॅनचा अहवाल आला. त्यावरून मला पुन्हा भरती केले. खासगी लॅबला शासनाने परवानगी दिलेली आहे. परंतु निगेटिव्ह असताना पुन्हा भरती का केले? मी जर इथे पाॅझिटिव्ह झालो तर त्याला कोण जबाबदार राहील? त्यामुळे रुग्णालयातून सुटी दिली पाहिजे, असे हा रुग्ण म्हणाला.

मी प्रामाणिक, पण...होम आयसोलेशनमधून मी कुठेही बाहेर गेलो नाही. दुबईतील मित्र आणि आता कुटुंबीयदेखील निगेटिव्ह आलेले आहेत. मी प्रामाणिक आहे. त्यामुळे स्वत:हून तपासणी करून घेतली. कारण दुसऱ्या लाटेत कोरोना होऊन गेलेला आहे. तपासणीच्या दोन दिवसांनंतर मनपाचा फोन आला. परदेशातून आलेले किती लोक तपासणीविना शहरात फिरत आहेत, असा प्रश्न या तरुणाने उपस्थित केला. दिल्ली किंवा औरंगाबादेत विमानतळावरच तपासणी झाली असती तर मी थेट रुग्णालयात गेलो असतो, असेही तो म्हणाला.

...म्हणे कडेकोट बंदोबस्त..रुग्ण कडेकोट बंदोबस्तात असल्याचे म्हटले जात आहे. रुग्ण आहे, एखादा गुन्हेगार नाही. त्यामुळे नागरिकांनी फार भीती बाळगू नये. लस घेतली पाहिजे, असेही हा तरुण म्हणाला.

परदेशातून आलेल्या प्रत्येकाची तपासणीपरदेशातून आलेल्या नागरिकांची यादी करण्यात आली आहे. प्रत्येकाला शोधून तपासण्यात येत आहेत. सदर ओमायक्राॅनगस्त तरुणाचा सोमवारी पुन्हा एकदा स्वॅब घेतला जाईल. त्याच्या कुटुंबातील तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांची ७ दिवसांनंतर पुन्हा एकदा तपासणी केली जाईल.- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या