शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

आठ्ठरवाडीत स्मशानभूमीवरून तणाव

By admin | Updated: August 9, 2014 00:28 IST

पुसेगाव : हिंगोली तालुक्यातील आठ्ठरवाडी येथे स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने तणाव निर्माण

पुसेगाव : हिंगोली तालुक्यातील आठ्ठरवाडी येथे स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने आणि आतापर्यंत ज्याठिकाणी अंत्यसंस्कार केले जायचे, त्याठिकाणी घरे बांधण्यात आल्याने ८ आॅगस्ट रोजी सकाळी एका ग्रामस्थाच्या निधनानंतर मोठा बाका प्रसंग निर्माण झाला. जागेच्या कारणावरून गावात काही काळ तणाव निर्माण झाल्याने तहसीलदार पोलिसांच्या फौजफाट्यासह गावात दाखल झाल्यानंतर हा प्रश्न सांमजस्याने सोडविण्यात आला. आठ्ठरवाडी येथील शेतकरी निवृत्ती गोविंदा सिरामे, शेषराव गोविंदराव सिरामे व त्यांची मुले अनेक वर्र्षापासून गाव सोडून बाहेरगावी कामासाठी गेले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी सिरामे यांच्या मालकीच्या गट क्र.५०३ व ४८७ मधील शेताचा अंत्यविधीसाठी वापर सुरू केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी निवृत्ती व शेषराव सिरामे हे कुटुंबियांसह गावात राहण्यासाठी आले आहेत. त्याठिकाणी त्यांनी घर बांधून राहण्यास सुरूवात केली असून ‘आता या ठिकाणी अंत्यविधी करू नका’अशी ग्रामस्थांना विनंतीही केली. ८ आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आठ्ठरवाडी येथील गणपतराव सटवाजी सिरामे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कुठे करायचा? हा प्रश्न निर्माण झाला. काही ग्रामस्थांनी गावालगतच्या गट क्र.५०३ व ४८७ मध्येच अंत्यविधी करण्याचा आग्रह धरला. त्यास निवृत्ती सिरामे व शेषराव सिरामे यांनी विरोध दर्शवल्याने गावात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे मंडळ अधिकारी एम. एस. खंदारे, तलाठी इनामदार व ग्रामसेवकाने याबाबत प्रशासनाला कळविले. त्यानुसार हिंगोलीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर, गटविकास अधिकारी डॉ. विशाल राठोड, नर्सी ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम बाचेवाड पोलिसांचा फौजफाटा घेऊन सकाळी ८ वाजता गावात दाखल झाले.तहसीलदार कडवकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. आठ्ठरवाडीतील स्मशानभूमीची ग्रामपंचायतीकडे नमुना नं. ८ व सातबाराला नोंद नसल्याने शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी हिंगोलीच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. परंतु त्याबाबत अद्याप कोणताही आदेश देण्यात आलेला नसल्याने पूर्वीप्रमाणे परंपरागत स्मशानभूमी असलेल्या जागेवर अंत्यविधी केला जावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यावर तहसीलदार कडवकर यांनी पोलीस पाटील शालिकराम सिरामे, ग्रा. पं. सदस्य कानबाराव सिरामे, पंजाबराव कुरूंदे पाटील व ग्रामस्थांना समजावून सांगत हा वाइ मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जमिनीचे मूळ मालक असलेल्या सिरामे यांनी रस्त्याच्या पलीकडे आपल्या गट क्र.४३० मधील २ गुंठे जमीन स्मशानभुमीसाठी तत्काळ उपलब्ध करून दिली. त्यामुळे अखेर हा प्रश्न सुटला आणि शुक्रवारी दुपारी ३ वाजता त्याठिकाणी गणपतराव सिरामे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभुमीच्या वादामुळे आठ्ठरवाडीत शुक्रवारी दिवसभर तणावाची स्थिती होती. बीडीओ राठोड यांनी स्मशानभुमीच्या नवीन जागेवर पंचायत समितीमार्फत शेड उपलब्ध करून दिले जाईल, असे ग्रामस्थांना सांगितले. तहसीलदारांच्या पुढाकाराने गावातील हा प्रश्न सोडविण्यात प्रशासनाला यश आले. (वार्ताहर)