शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कचऱ्यासाठी पुन्हा निविदा

By admin | Updated: July 2, 2017 00:21 IST

नांदेड : एटूझेडचे काम बंद केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून कचऱ्याच्या प्रश्नावरुन सुरु असलेल्या राजकारणामुळे मनपाची इभ्रत कचऱ्यात गेली असताना,

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : एटूझेडचे काम बंद केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून कचऱ्याच्या प्रश्नावरुन सुरु असलेल्या राजकारणामुळे मनपाची इभ्रत कचऱ्यात गेली असताना, आता पुन्हा नव्याने कचरा उचलण्यासाठी मनपाने निविदा काढल्या आहेत़ यापूर्वी पाच वेळेस कचऱ्याच्या निविदा काढूनही एकाही कंत्राटदाराने प्रतिसाद दिला नव्हता हे विशेष़कचरा उचलण्याचे काम सुरुवातीला अँथोनी या कंत्राटदाराला देण्यात आले होते़ कचऱ्याच्या वजनाप्रमाणे अँथोनीला मनपाकडून रक्कम अदा केली जात होती़ महिन्याकाठी अशाप्रकारे जवळपास ८० लाख ते १ कोटीपर्यंतची रक्कम मनपाला संबंधित कंत्राटदाराला द्यावी लागत होती़ या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तुप्पा येथे खत प्रकल्प उभारण्याची तयारी करण्यात आली होती़ त्यासाठी कोट्यवधींचा निधीही खर्च करण्यात आला, परंतु हा प्रकल्प सुरु झालाच नाही़ त्यात कचरा कंत्राटदाराकडून मापात पाप करण्याच्याही अनेक बाबी उघडकीस आल्या़ त्यानंतर दुसऱ्या वेळेत कचऱ्याचे कंत्राट एटूझेड या कंपनीला देण्यात आले़ परंतु सुरुवातीपासून या कंपनीचा कारभार वादग्रस्त ठरला होता़ मनपाने अनेकवेळा या कंपनीला लाखो रुपयांचा दंड ठोठावला़ त्यात कधी कंपनीने काही नगरसेवकांना हाताशी धरुन दंडातून अनेकवेळा सूटही मिळविली़ महासभेत कचऱ्याच्या प्रश्नावरुन आकांडतांडव करणारे नगरसेवक बाहेर निघताच, कंत्राटदाराच्या गळ्यात गळे घालून फिरत असल्याचे दृश्यही मनपात पहावयास मिळाले़ परंतु दोन महिन्यापूर्वी एटूझेडचे काम बंद करण्यात आले़ कंपनीकडून मजूरांचे वेतनही देण्यात आले नाही़ त्यावरुन बराच गोंधळ झाला़ त्यानंतर मनपाने कचरा उचलण्यासाठी पर्यायी व्यवस्थाच न केल्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या बिकट बनली़ जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचल्यामुळे शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले होते़ तत्पूर्वी मनपाने कचऱ्यासाठी चार वेळेस काढलेल्या निविदांनाही प्रतिसाद मिळाला नाही़ कचरा संकलित करुन तो तुप्पा येथील खत प्रकल्पात पोहोचविल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्याबाबत या निविदा काढण्यात आल्या होत्या़ त्यामुळे कंत्राटदारांनी त्याकडे पाठ फिरविली़ आता पुन्हा एकदा मनपाने निविदा काढल्या आहेत़ त्यामध्ये घरोघरी जावून कचरा संकलित करुन तो खत प्रकल्पापर्यंत पोहोचवा, असे त्यात नमूद आहे़ त्यामुळे यावेळेस तरी, कचऱ्यासाठी कंत्राटदार पुढे येतील अशी अपेक्षा आहे़ दरम्यान, शहरातील कचरा उचलण्याचे काम मनपाचे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केले जात आहे़ सर्वाधिक ७० टन कचरा इतवारा झोन मधून उचलण्यात येत आहे़ तर शिवाजीनगर, तरोडा, सिडको भागातून १५ ते २० टन कचरा उचलण्यात येत आहे़