शहरं
Join us  
Trending Stories
1
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
2
Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!
3
पैसा तिप्पट करणारी गुंतवणूक! 'या' ५ म्युच्युअल फंडांनी ३ वर्षांत दिले ३१% पेक्षा जास्त रिटर्न!
4
धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी जात असताना डंपर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
5
पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
6
पुतिन यांच्या भारत दौऱ्याची तारीख ठरली; पीएम मोदींशी ऊर्जा, संरक्षण, व्यापारावर होणार चर्चा
7
Mumbai Rape Case: जाग आली तेव्हा बाजूला बसलेले होते दोन पुरूष, विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक
8
Jara Hatke: चित्ता, बिबट्या आणि जग्वार; तिघांची प्रजाती एकच, पण 'असा' ओळखा फरक 
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: ७ दिवस शक्य नाही, मग ३ दिवसांत गुरुचरित्र पारायण करता येते; कसे? पाहा, नियम
11
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
12
दमदार कमाईची संधी! ५४२१ कोटींचा IPO ३ डिसेंबरला उघडणार; जीएमपी-प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
13
वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळणार, संघाचे नेतृत्व 'मराठी मुलगा' करणार !
14
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
15
Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
16
AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
17
Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
18
संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
19
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
20
फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यासाठी पुन्हा निविदा

By admin | Updated: July 2, 2017 00:21 IST

नांदेड : एटूझेडचे काम बंद केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून कचऱ्याच्या प्रश्नावरुन सुरु असलेल्या राजकारणामुळे मनपाची इभ्रत कचऱ्यात गेली असताना,

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : एटूझेडचे काम बंद केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून कचऱ्याच्या प्रश्नावरुन सुरु असलेल्या राजकारणामुळे मनपाची इभ्रत कचऱ्यात गेली असताना, आता पुन्हा नव्याने कचरा उचलण्यासाठी मनपाने निविदा काढल्या आहेत़ यापूर्वी पाच वेळेस कचऱ्याच्या निविदा काढूनही एकाही कंत्राटदाराने प्रतिसाद दिला नव्हता हे विशेष़कचरा उचलण्याचे काम सुरुवातीला अँथोनी या कंत्राटदाराला देण्यात आले होते़ कचऱ्याच्या वजनाप्रमाणे अँथोनीला मनपाकडून रक्कम अदा केली जात होती़ महिन्याकाठी अशाप्रकारे जवळपास ८० लाख ते १ कोटीपर्यंतची रक्कम मनपाला संबंधित कंत्राटदाराला द्यावी लागत होती़ या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तुप्पा येथे खत प्रकल्प उभारण्याची तयारी करण्यात आली होती़ त्यासाठी कोट्यवधींचा निधीही खर्च करण्यात आला, परंतु हा प्रकल्प सुरु झालाच नाही़ त्यात कचरा कंत्राटदाराकडून मापात पाप करण्याच्याही अनेक बाबी उघडकीस आल्या़ त्यानंतर दुसऱ्या वेळेत कचऱ्याचे कंत्राट एटूझेड या कंपनीला देण्यात आले़ परंतु सुरुवातीपासून या कंपनीचा कारभार वादग्रस्त ठरला होता़ मनपाने अनेकवेळा या कंपनीला लाखो रुपयांचा दंड ठोठावला़ त्यात कधी कंपनीने काही नगरसेवकांना हाताशी धरुन दंडातून अनेकवेळा सूटही मिळविली़ महासभेत कचऱ्याच्या प्रश्नावरुन आकांडतांडव करणारे नगरसेवक बाहेर निघताच, कंत्राटदाराच्या गळ्यात गळे घालून फिरत असल्याचे दृश्यही मनपात पहावयास मिळाले़ परंतु दोन महिन्यापूर्वी एटूझेडचे काम बंद करण्यात आले़ कंपनीकडून मजूरांचे वेतनही देण्यात आले नाही़ त्यावरुन बराच गोंधळ झाला़ त्यानंतर मनपाने कचरा उचलण्यासाठी पर्यायी व्यवस्थाच न केल्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या बिकट बनली़ जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचल्यामुळे शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले होते़ तत्पूर्वी मनपाने कचऱ्यासाठी चार वेळेस काढलेल्या निविदांनाही प्रतिसाद मिळाला नाही़ कचरा संकलित करुन तो तुप्पा येथील खत प्रकल्पात पोहोचविल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्याबाबत या निविदा काढण्यात आल्या होत्या़ त्यामुळे कंत्राटदारांनी त्याकडे पाठ फिरविली़ आता पुन्हा एकदा मनपाने निविदा काढल्या आहेत़ त्यामध्ये घरोघरी जावून कचरा संकलित करुन तो खत प्रकल्पापर्यंत पोहोचवा, असे त्यात नमूद आहे़ त्यामुळे यावेळेस तरी, कचऱ्यासाठी कंत्राटदार पुढे येतील अशी अपेक्षा आहे़ दरम्यान, शहरातील कचरा उचलण्याचे काम मनपाचे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केले जात आहे़ सर्वाधिक ७० टन कचरा इतवारा झोन मधून उचलण्यात येत आहे़ तर शिवाजीनगर, तरोडा, सिडको भागातून १५ ते २० टन कचरा उचलण्यात येत आहे़