औरंगाबाद : महापालिकेने दिलेल्या ११२ कोटींच्या एलईडी पथदिव्यांच्या कंत्राटाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ब्रेक लावला. त्यामुळे पालिकेने पथदिव्यांसाठी नव्याने कंत्राट देण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, ती प्रक्रियाही आता थंडावली आहे. त्यामुळे शहरातील रस्ते अंधारातच राहण्याची शक्यता आहे. जुन्या कंत्राटदारांकडूनच दिवे लावण्याचे काम पालिका करीत आहे. ४० हजार पथदिवे आणि २८ हजारांच्या आसपास खांब मुख्य रस्त्यांवर आहेत. जालना रोडसारखा रस्ता अंधारात आहे. पैशांअभावी सर्व कामे ठप्प आहेत. मनपा कंत्राटदारांचे पैसे जसे अदा करणार तसे शहरातील रस्ते उजळणार, असेच आता म्हणावे लागणार आहे. आॅगस्टमध्ये ११२ कोटी रुपयांचे पथदिवे बसविण्याचे कंत्राट इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टिम्स प्रा.लि. आणि पॅरागॉन केबल इंडिया (जॉइंट व्हेंचर) या संस्थेला देण्यात आले होते. ४० हजार एलईडी पथदिवे लावण्यासाठी ८६ कोटी ९३ लाख १७ हजार ४०० रुपये, इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी २५ कोटी २८ लाख ५० हजार ६८० रुपये, दोन्ही मिळून ११२ कोटी २१ लाख ६८ हजार रुपयांची ती निविदा होती. ४बीओटीवरील कामासाठी ९६ महिन्यांचा कालावधी होता. ३ महिन्यांचा प्रीपेटरी कालावधी होता. कं त्राटदाराला २ कोटी ७२ लाख रुपये दरमहा देण्याचा निविदेत उल्लेख होता. ४या निविदा प्रक्रि येवर कोर्टाने ताशेरे ओढल्यामुळे शहरातील पथदिव्यांचे काम सुरू झाले नाही. परिणामी, पालिकेला आहे त्या कंत्राटदारांकडून पथदिवे लावण्याचे काम हाती घ्यावे लागले. आयुक्त महाजन म्हणाले की, जुन्या कंत्राटदारांची रक्कम काही प्रमाणात अदा करण्यात आली आहे. हळूहळू रक्कम अदा करू. जुन्या कंत्राटदारांकडूनच काम करून घ्यावे लागणार आहे. नवीन निविदेबाबत त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.
पथदिव्यांंची निविदा गुलदस्त्यात
By admin | Updated: December 2, 2014 01:10 IST