शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

दहा हजार क्विंटल हरभर्‍याचे शेतकर्‍यांना मिळेनात पैसे

By admin | Updated: May 21, 2014 00:13 IST

दिनेश गुळवे , बीड यावर्षी जिल्ह्यात नाफेडच्या वतीने तब्बल दहा हजार क्विंटल हरभर्‍याची खरेदी करण्यात आली आहे.

दिनेश गुळवे , बीड यावर्षी जिल्ह्यात नाफेडच्या वतीने तब्बल दहा हजार क्विंटल हरभर्‍याची खरेदी करण्यात आली आहे. यातील काही पैसे केवळ ‘चण्या-फुटाण्या’प्रमाणे देण्यात आले आहेत. हरभरा व तुरीच्या कोट्यवधी रुपयांपासून शेतकरी महिनोमहिने वंचित आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. गहू, ज्वारी, हरभरा, फळबागा, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकरी गारपीटीच्या अनुदानापासूनही वंचित असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे शेतकर्‍यांनी घाम गाळून मिळविलेल्या पिकांचे पैसे मात्र शेतकर्‍यांना महिनोमहिने मिळत नाहीत. शेतकर्‍यांच्या मालाला योग्य किंमत मिळावी, शेतकर्‍यांची दलालासह इतरांकडून पिळवणूक होऊ नये म्हणून नाफेडच्या वतीने तूर, हरभरा, मका यांची हमीभावाने खरेदी करण्यात आली. तुरीची चार हजार तीनशे, हरभर्‍याची तीन हजार शंभर तर मकाची तेराशी रुपये प्रतीक्विंटलने खरेदी करण्यात आली. शेतकर्‍यांकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे चोवीस तासामध्ये देण्यासंदर्भात नियम आहे. हा नियम येथे डावलला जात नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील बीड, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई केज, धारूर, पाटोदा व कडा येथील खरेदी विक्री संघाच्या अनेक केंद्रावर शेतकर्‍यांनी हरभरा, तूर व मका घातलेली आहे. यातील मकाचे पैसे शेतकर्‍यांना मिळालेले आहेत. इतर पैसे मिळत नसल्याने शेतकर्‍यांना जिल्हा पणन अधिकार्‍यांच्या कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. यावषीच्या हंगामात नोव्हेंबर ते ३१ मार्च दरम्यान विविध केंद्रावर तब्बल ९ हजार ४६० क्विंटल हरभर्‍याची खरेदी करण्यात आली होती. यापोटी शेतकर्‍यांना २ कोटी ९३ लाख २६ हजार रुपये मिळणार होते. आतापर्यंत मात्र केवळ ३१ लाखांवर शेतकर्‍यांची बोळवण करण्यात आली आहे. तब्बल पाच ते सहा महिन्यापासून अनेक शेतकर्‍यांचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी सांगितले. हरभर्‍यासह तुरीचेही कोट्यवधी रुपये अद्याप शेतकर्‍यांना मिळालेले नाहीत. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी १८ हजार ६२ क्विंटल तूर नाफेडच्या खरेदी केंद्रावर घातलेली आहेत. यापोटी शेतकर्‍यांना ५ कोटी १६ लाख रुपये मिळाले आहेत. असे असले तरी अद्यापही २ कोटी ६० लाख रुपयांची शेतकर्‍यांना प्रतीक्षा आहे. खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकर्‍यांनी बियाणे, खत खरेदी, शेतीची मशागत सुरू केली आहे. शेतकर्‍यांना हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणी येत असल्याचे शेतकरी संघटनेचे मधुकर पवळ यांनी सांगितले. शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर पैसे थकल्याने ते पैसे तात्काळ देण्याची मागणी शेतकर्‍यांतून केली जात आहे. अधिकारीही हतबल हरभरा, तुरीची कोट्यवधी रुपये अद्यापही शेतकर्‍यांना मिळालेले नाहीत. यासंदर्भात जिल्हा पणन अधिकारी ए. एस. वारे म्हणाले की, पैशासाठी सातत्याने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. याउपरही मोठ्या प्रमाणावर पैसे मिळत नसल्याने त्यांनी हतबलता व्यक्त केली. गुत्तेदारांच्या पैशासाठी पाठपुरावा बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे हरभरा, तूर पिकाचे तब्बल ५ कोटी रुपये अनेक दिवसांपासून मिळत नाहीत. यासाठी एकही लोकप्रतिनिधी कधी विचारणा करीत नाही. उलट गुत्तेदारांच्या पैशासाठी विविध कार्यालयात लोकप्रतिनिधी फोन करतात वेळप्रसंगी स्वत: जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेची मराठा प्रमुख कालिदास आपेट यांनी केला आहे. शेतकर्‍यांचे पैसे तात्काळ देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.