शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

दंत महाविद्यालयाच्या वाढल्या दहा जागा

By admin | Updated: July 19, 2014 01:21 IST

औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील बॅचलर आॅफ डेंटल सर्जरी (बी.डी.एस.) पदवी अभ्यासक्रमाच्या दहा जागा तब्बल १६ वर्षांनंतर वाढविण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील बॅचलर आॅफ डेंटल सर्जरी (बी.डी.एस.) पदवी अभ्यासक्रमाच्या दहा जागा तब्बल १६ वर्षांनंतर वाढविण्यात आल्या आहेत. याविषयीचे पत्र केंद्रीय आरोग्य विभागाकडून शासकीय दंत महाविद्यालयास गुरुवारी प्राप्त झाले. आता या महाविद्यालयातील बी.डी.एस.ची विद्यार्थी प्रवेश क्षमता ४० वरून ५० झाली आहे.मराठवाड्यातील पहिले शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय असलेल्या या रुग्णालयाकडे सतत शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. महाविद्यालयास सोयी- सुविधा पुरविण्यासाठी वेळावेळी पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. मात्र, देशपातळीवर या महाविद्यालयाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे.१९८२ साली महाविद्यालयाची स्थापना झाली त्यावेळी तेथे बी.डी.एस. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी ३० जागा होत्या. भारतीय दंत परिषदेने आपल्या नियमात बदल करून ३० आणि ४० विद्यार्थी क्षमतेच्या महाविद्यालयातील सुविधांचे निकष सारखेच असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे १९९८ साली या महाविद्यालयाची बी.डी.एस. प्रवेश क्षमता ३० वरून ४० करण्यात आली होती. अशाच प्रकारचा निर्णय पुन्हा दंत परिषदेने घेतल्याने अधिष्ठाता डॉ. एस.पी. बारपांडे यांनी महाविद्यालयाची प्रवेश क्षमता ४० वरून ५० करावी, असा प्रस्ताव शासनामार्फत केंद्रीय आरोग्य मंत्रालयास पाठविला होता. सतत दोन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर दंत परिषदेने मे महिन्यात एका पथकामार्फत महाविद्यालयाची तपासणी केली. या पथकाने दिलेल्या अहवालाच्या आधारे दंत परिषदेने केलेल्या शिफारशीनंतर केंद्रीय आरोग्य विभागाने महाविद्यालयातील प्रवेश क्षमता ५० करण्यास मंजुरी दिली. याबाबतची माहिती गुरुवारी त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली. तिसऱ्या फेरीत होतील प्रवेश पूर्णयाविषयी अधिष्ठाता डॉ. बारपांडे म्हणाले की, प्रवेश क्षमता आता ५० झाल्याने याविषयी शासनाकडून अध्यादेश निघेल. या अध्यादेशाची माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठास सादर करण्यात येईल. त्यानंतर काही दिवसांत विद्यापीठाकडून पुन्हा महाविद्यालयातील सुविधांचा आढावा घेण्यात येईल.ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच वैद्यकीय शिक्षण संचालकांना महाविद्यालयातील वाढीव प्रवेश क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात कळविण्यात येईल. तिसऱ्या प्रवेश फेरीत वाढलेल्या जागानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल.