शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

हिवाळ्यामध्येही तापमान वाढलेले; थंडीचा जोर ओसरला

By admin | Updated: January 4, 2016 00:09 IST

बीड : गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी थंडीचा कडाका वाढला होता; मात्र आता तापमान पुन्हा हळूहळू वाढूू लागले असल्याने दुष्काळ जाणवू लागला आहे.

बीड : गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी थंडीचा कडाका वाढला होता; मात्र आता तापमान पुन्हा हळूहळू वाढूू लागले असल्याने दुष्काळ जाणवू लागला आहे. मध्यंतरी वाढलेल्या थंडीमुळे उन्हाची तीव्रता कमी झाली; परंतु आता उन्हाळ्याप्रमाणे चटके बसू लागले आहेत.डिसेंबर अखेरचा आठवडा हा सर्वाधिक थंडीचा म्हणून अनुभवला गेला. किमान तापमान १० अंशापर्यंत जाऊन पोहोचले होते. ग्रामीण भागात तर पहाटेच्या वेळी बाहेर पडणे कठीण झाले होते. थंडी वाढली असल्यामुळे अनेकांचे हाल झाले होते. आता परिस्थिती बदलली आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुपारी बाराच्या सुमारास टोपी-गमछे घेऊन नागरिकांना बाहेर पडावे लागत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मिळालेल्या माहितीनुसार शनिवारचे कमाल ३०, तर किमान २५ अंश तापमानाची नोंद केली गेली. दुष्काळ पडला असल्यामुळे रुक्षपणा कायम जाणवत आहे. त्यात उन्हाची भर पडत चालली आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात फारशी थंडी नव्हती. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात गारपीट झाली. यामुळे तापमान सामान्य होते. यंदा परिस्थिती बदलली आहे. थंडीचा जोर ओसरू लागला असल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. थंडीमध्ये थोडाफार चढ-उतार होत आहे. हा भाग वगळला तर दुपारी गरमी जाणवू लागते. सद्य:परिस्थिती पाहता पुढील काळात तापमान पुन्हा वाढू शकते. कारण दुष्काळामुळे पाण्याची कमतरता आहे, त्यातच झाडे तोडली जात आहेत. याचा परिणाम निसर्गावर होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)