शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

तेजस ठाकरे यांना वन्यजिवांत रस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:02 IST

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हे युवा सेनेची कमान सांभाळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा ...

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हे युवा सेनेची कमान सांभाळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असली तरी सध्या ते राजकारणात येणार नाहीत. तेजस हे वन्यजीवप्रेमी आहेत. अनेक वर्षे राज्यातील बहुतांश जंगलात जाऊन त्यांनी विविध प्रजातींचा शोध घेतला आहे. सध्या त्यांची आवड ही वाइल्डलाइफकडेच आहे. त्यांना राजकारणात यायचे असेल तर त्याचा निर्णय ते स्वत: आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील, असे युवासेनेचे सचिव वरुण देसाई यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

देसाई हे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी सांगितले की, या संपूर्ण दौऱ्यातून संघटन मोठे करण्याचा प्रयत्न आहे. राज्याच्या प्रत्येक विद्यापीठात सिनेट निवडणुका युवासेना लढविणार आहे. एखाद्या प्रभागात, वॉर्डात युवा सेनेचा कार्यकर्ता, पदाधिकारी चांगले काम करीत असेल तर स्थानिक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते त्या कार्यकर्त्याला निवडणुकीत उमेदवारीची संधी देतील. तिकीट वाटप, निवडणुकांचे निर्णय शिवसेनेचे नेते घेत असतात. त्यांचा निर्णय युवासैनिकांना मान्य असेल. युवासेनेसाठी वेगळा विशेष कोटा निवडणुकीत असावा, असा विषय नाही. जो चांगले काम करीत ते पुढे येईल. त्याला संधी मिळेल. औरंगाबाद, जालना, बीडसह मराठवाड्यातील कोणत्याही जिल्हा युवा अधिकाऱ्याला राजकीय वारसा नसल्याचा, असा दावा देसाई यांनी केला.

कोरोना रुग्ण ज्या ठिकाणी वाढत आहेत, तेथे मेळावा घेण्यात येत नाही. गुरुवारी बीडमध्ये परवानगी नसताना मेळावा घेतल्याची गंभीर दखल घेतली आहे, असे देसाई म्हणाले. यावेळी अमोल घोले, आदित्य शिरोडकर, राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, ऋषिकेश जैस्वाल, किरण तुपे, मिथुन व्यास आदींची उपस्थिती होती.

पाच ते दहा वर्षे काम करणाऱ्यांना प्रमोशन

ज्या पदाधिकाऱ्यांनी पाच ते दहा वर्षे युवा सेनेच्या संघटनेत काम केले, त्यांना प्रमोशन देऊन त्यांच्या जागी नवीन कार्यकर्ते संघटनेत आणले जाणार आहेत, असे सांगून देसाई यांनी संघटनेत लवकरच फेरबदल होणार असल्याचे सुतोवाच केले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे, असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.