शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पेपरला तांत्रिक अडचणी, विद्यार्थ्यांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:02 IST

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बी. ए. प्रथम वर्षाच्या पहिल्या सेमीस्टरच्या पहिला पेपरला विद्यार्थ्यांना लाॅगिनला तांत्रिक अडचणी आल्याने ...

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बी. ए. प्रथम वर्षाच्या पहिल्या सेमीस्टरच्या पहिला पेपरला विद्यार्थ्यांना लाॅगिनला तांत्रिक अडचणी आल्याने चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. सोमवारी १० ते १ वाजेदरम्यान परीक्षा होती. मात्र, साडेबारा वाजेपर्यंत विद्यार्थी लाॅगीन करु शकले नव्हते. तर ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडल्याने पेपरला मुकावे लागणार या भीतीने ऑफलाईन परीक्षेसाठी महाविद्यालय गाठले तर आता पर्याय बदलता येणार नसल्याचे महाविद्यालयाने स्पष्ट करुन परीक्षेच्या समन्वयकांना फोन करण्याचा सल्ला दिल्याचे विद्यार्थी म्हणाले.

कोरोनामुळे विद्यापीठाने परीक्षेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेला पसंती देत तो पर्याय निवडला. सोमवारी परीक्षेसाठी १ तासाचा अवधी होता. १० ते १ वाजेच्या दरम्यान विदयार्थी ला १ तासात पेपर देणे अनिवार्य होते. १० वाजेपासून विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षेच्या संकेतस्थळावर लॉगीन करण्याचा प्रयत्न करत होतो. १२ वाजेपर्यंत काही विद्यार्थ्यांचे लॉगीन झाले नाही.

देवगिरी महाविद्यालयाचे विद्यार्थी सोमेश खेडेकर, तुषार गणकवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील प्राध्यापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे मोबाईल व्यस्त येत होते. शेवटपर्यंत संपर्क झाला नाही. शेवटी १२ ते १ असा एक तास आम्हाला पेपर सोडविण्यासाठी बाकी होता. साडेबारा वाजता संकेतस्थळ सुरू झाले. त्या वेळेत काही विद्यार्थी लॉगीन झाले. त्यांना पेपर सोडवण्यासाठी १ तासाचा कालावधी असतानासुध्दा एका तासापेक्षा कमी वेळे मिळाला. जे विद्यार्थी पेपर सोडवत होते त्यांनी गोंधळून जाऊन वेळेच्या आत पेपर सबमिट केला. अखेर विद्यापीठाकडून १ ते २ असा एका तासांचा वेळ वाढवूनदिला.

---

मी अंध आहे. ऑफलाईन परीक्षेला लेखनिक मिळत नसल्याने ऑनलाईनचा पर्याय निवडला. मात्र, दिवसभर लाॅगीन झाले नाही. महाविद्यालयांच्या समन्वयकांनी मदत केली नाही. संपर्कच होत नाही आहे. आता बुधवारी पेपर आहे. त्याला तरी अडचण यायला नको. तांत्रिक अडचणी विद्यापीठाने दूर कराव्यात.

-अजय ढोबाळ, विद्यार्थी

--

आजपासून पेपर सुरू झाले. ऑनलाईन पर्याय निवडून पश्चाताप झाला. समन्वयासाठी ज्यांचे नंबर दिले. त्यांच्याकडूनही मदत मिळाली नाही. अखेर वैजापूरच्या महाविद्यालय समन्वयकांनी मदत केली. पहिल्या दिवशी दिवसभर तारांबळ उडाली होती. अशा प्रकारच्या अडचणी पुढच्या पेपरला येऊ नये म्हणून विद्यापीठाने उपयायोजना केल्या पाहिजेत.

-मधुरा दलाल, विद्यार्थिनी